या ३ लोकांचं भलं कधीच करू नका; नाहीतर येईल पच्छाताप करण्याची वेळ.!

अध्यात्म

तुमचा स्वभाव खूप चांगला आहे, तुम्ही नेहमी दुसर्‍यांचे चांगले व्हावे असाच विचार करता. अनेकदा आपण कर भला तो हो भला म्हणजेच दुसऱ्याच जर आपण चांगले केले तर देव सुद्धा आपले चांगले करतो अशी आपली भावना असते. परंतु एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला हवी की हे जग आता बदललेले आहे.

ते पूर्वी इतके सरळ राहिलेले नाही. जर तुम्ही अशाच प्रकारे साधेपणाने वागत राहिलात तर एक ना एक दिवस तुमच्यावरती पश्चात्ताप करण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही ,तज्ज्ञांनी खूप वर्षांपूर्वी सांगून ठेवले की समाजामध्ये अशा काही व्यक्ती असतात की ज्यांचे चांगले पण चुकूनही करू नका अन्यथा आपल्यावरती संकट ओढवल्या शिवाय राहत नाहीत तर ती व्यक्ती कोणती आहे.? हे आज आपण या लेखात जाणून घेणार आहोत.

आचार्य चाणक्य म्हणतात की ची पहिली व्यक्ती आहे ती म्हणजे दुष्ट स्वभावाची स्त्री. अशी स्त्री तिचा स्वभाव दृष्ट आहे, चारित्र्यहीन आहे अशा स्त्रीचे चांगले करण्याचा विचारही करू नका कारण तुम्ही जर तसे केले तर समाजामध्ये तुमच्या कुटुंबामध्ये तुम्हाला अपयशाला सामोरे जावे लागते. समाजामध्ये तुमची हानी होते. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा मान राहत नाही.

हे वाचा:   नवरात्री मध्ये कधीही जर दिसले हे पाच संकेत; तर समजून जा देवी प्रसन्न आहे तुमच्यावर..हे संकेत महालक्ष्मीचा आशीर्वाद दर्शवत असतात..

या स्त्रिया धर्माच्या विपरीत धर्माच्या विरुद्ध काम करतात आणि म्हणूनच त्यांच्या पापामध्ये तुम्ही सुद्धा त्या पापाचे भागीदार बनता.पुढील दुसरी व्यक्ती आहे ती म्हणजे मूर्ख लोक.

असे लोक फक्त स्वतः चे एकतात आणि दुसऱ्याचे अजिबात ऐकत नाहीत अशा लोकांचं भलं होण्यासाठी त्यांना उपदेश करू नका. त्यांना कोणतीही चांगली गोष्ट सांगू नका कारण तुम्ही त्या मुर्खांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला तर हे मूर्ख लोक तुम्हाला खोटे ठरवतील अशा प्रकारचे तर्क वितर्क करतील आणि ते म्हणतात तेच खरं आहे आणि तुमचे म्हणणं कशाप्रकारे खोटे आहे हे ते तुम्हाला समजावून सांगतील आणि यामुळे तुम्हाला मानसिक ताण तणावाला सामोरे जावे लागेल.

तुमचा रक्तदाब वाढल्याशिवाय राहणार नाही आणि तिसऱ्या प्रकारचे लोक आहेत ते म्हणजे असे लोक जे सदैव दुखी राहतात. कोणत्याही प्रसंगी त्यांच्या चेहर्‍यावरील दुःख काही कमी होत नाही.

हे वाचा:   देव दर्शनानंतर लोकं मंदिरात का बसतात.? ९९% लोकांना माहिती नाही याचे खरे कारण.!

खरे तर देवाने परमेश्वराने आपल्याला जे काही दिले आहे त्यामुळे आपण सुखी राहावे त्यामध्ये समाधान मानायला हवे मात्र हे लोक कितीही पदरात पडले तरी सुद्धा दुःखीच राहतात आणि तुम्ही जर यांच्या संपर्कात आला तुम्ही त्यांना मदत करायला गेलात तर लक्षात घ्या हा त्यांचा हा दुःखाचा रोग तुम्हाला सुद्धा लागतो आणि तुम्हीसुद्धा दुखी बनतात म्हणून या तिसऱ्या प्रकारच्या लोकांपासून सुद्धा आपण लांब राहायला हवे त्यांना चुकून सुद्धा मदत करू नये. ते हे होते तिन प्रकारचे लोक ज्यांना कधीच चुकून सुद्धा मदत करू नये.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.