तव्यावर ही वस्तू कधीच ठेवू नये ! नाहीतर भयंकर गरिबी घरात येते..लक्ष्मी नाराज होते..जाणून घ्या

अध्यात्म

तवा आपल्या स्वयंपाक घराचा एक अविभाज्य भाग आहे जर तवा नसता तर आपण भाकरी किंवा पोळी बनवू शकलो नसतो. आज आपण तव्याच्या बाबतीत अश्या काही बाबी पाहणार आहे ज्या तुम्हाला अजूनपर्यंत कोणीही सांगितल्या नसतील. वास्तू शास्त्रानुसार स्वयंपाक घरातील तव्याचा काय महत्व आहे ते आपण पहाणार आहे.

आपल्या पैकी किती जणांना तर माहिती नसेल की तवा किंवा कढई राहूचे प्रतिनिधित्व करतात हे आपले नशीब बिगडू ही शकतात आणि आपल्याला अधोगती कडे ही नेऊ शकतात. हिंदू ध’र्मानुसार तवा कधीही पालथा ठेऊ नये. घरात ज्यावेळी कोणाचा मृत्यू होतो त्यावेळी तवा पालथा टाकतात म्हणजेच घरात स्वयंपाक बनवला जाणार नाही असा याचा अर्थ होतो.

म्हणजे घरातील कोणी सदस्य मृत झाल्यास तव्याचा वापर बंद केला आहे हे दर्शविण्यासाठी तवा पालथा टाकला जातो. आणि जर घरात कोणी व्यक्ती मुद्दाम तवा पालथा टाकत असतील तर हे एक अशुभतेचे लक्षण आहे म्हणून चुकूनही कधी तवा पालथा ठेऊ नये. खूप वर्षापर्यंत एकच तवा वापरू नये.

हे वाचा:   घरात तिजोरीवर यापैकी 1 वस्तू ठेवा; घरात धनाची समस्या कधीच राहणार नाही.!

कारण, दिवसेन दिवस तव्यावर तेलाचा थर होत जातो व घासूनही हा थर निघत नाही. काही घरामध्ये अगदी तेलाचे थर बसून काळेकुट्ट झालेले असतात आणि त्यावरच पोळ्या किंवा भाकरी केल्या जातात. परंतु हे आ’रोग्यासाठी हा-निकारक आहे जेव्हा आपण त्याच तव्यावर स्वयंपाक करतो त्यावेळी त्या थराचे काही अंश आपल्या स्वयंपाकात उतरतात.

आणि त्यामुळे आपल्याला किंवा आपल्या परिवारातील सदस्यांना गंभीर आजारांना सामोरे जाऊ लागू शकते हे अन्न दूषित होते व तेच दूषित अन्न आपण खातो. खूप काळापर्यंत आपण जर फुटलेल्या किंवा तळा गेलेल्या तव्यावर स्वयंपाक केला तर आपल्याला दोष लागतो. व आपण कधी धनवान होऊ शकत नाही आपण दरिद्रीच राहतो किंवा हळूहळू दारिद्य्र येण्यास सुरुवात होते.

तवा आणि कढई यांचे काम झाले की लगेचच स्वच्छ करून जागेवर ठेवावेत व गरम गरम तव्यावर कधीही पाणी टाकू नये. यामुळे घरात भांडण तंटे आणि वादविवाद होतात व घरात नेहमी कोणी ना कोणी आजारी पडते म्हणून तवा थंड झाला की नंतर त्याच्यावर पाणी टाकावे. तवा व कढई नेहमी स्वच्छच असावीत नाहीतर दोष लागतात.

हे वाचा:   ज्ञानी लोक का घालतात बोटात कासवाची अंगठी.? कासवाची अंगठी आपण घालू का नये.?

स्वयंपाक करताना ज्यावेळी आपण पहिली पोळी तव्यावर टाकतो त्यापूर्वी तव्यावर थोडेसे दूध शिंपडावे व त्यानंतर पोळ्या किंवा भाकरी करण्यास सुरुवात करावी यामुळे आपल्या कर्जापासून आपली मुक्तता होते. घरात बनवलेल्या पोळ्यामधील सर्वात पहिली पोळी साजूक तूप लावून गाईला खायला घालावी.

कारण गाईमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो. व गाईला जर आपल्या स्वयंपाकातील पहिली पोळी खायला दिली तर आपल्यावर सर्व देवी देवतांची कृपा होते व आपल्याला धनाची कमी कधीही जाणवत नाही आणि आपल्यावर देवी अन्नपूर्णाचा आशीर्वाद राहून आपले घर सदा धन धान्याने भरलेले राहते.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.