उठताना अचानक चक्कर येतेय का..? करा हा उपाय; सतत चक्कर येणे कायमचे होईल बंद.!

आरोग्य

वारंवार चक्कर येत असेल तर करा हा घरगुती उपाय. चक्कर येणे, गरगर करणे, भोवळ येणे तसेच डोळ्यापुढे अंधारी येणे हे जरी शुल्लक वाटत असले तरी हे कोणत्यातरी गंभीर आजाराचे लक्षण असू शकते पण कधीकधी शरीरामध्ये पित्ताचे प्रमाण वाढले असल्यास तरी डोळ्यासमोर अंधारी येणे, गरगर करणे अशा समस्या सुद्धा निर्माण होतात.

तरी चक्कर येण्यासारख्या छोटा समस्या सुरुवातीला उद्भवत असल्या तरी वैद्यकीय सल्ला घेणे महत्त्वाचे आहे परंतु अनेकदा सल्ले घेण्या आधी घरातील छोटे छोटे घरगुती उपाय करणे देखील महत्त्वाचे ठरते. बऱ्याचदा उठता- बसताना डोळ्यासमोर अंधारी येते, गरगर वाटते, चक्कर येऊ लागते. असे कधी कधी मेंदूला कमी रक्तपुरवठा होत असल्यामुळे सुद्धा होऊ लागते, अशावेळी एखाद्या सुरक्षित ठिकाणी थांबलो व तेथे छोटीशी झोप काढून मेंदू हृदय यांचे संतुलन करून चक्कर येण्या सारख्या समस्या कमी करता येऊ शकतात.

जर तुम्हाला चक्कर येण्याची समस्या वारंवार होत असेल तर ही समस्या कमी करण्यासाठी आज आपण या लेखांमध्ये एक महत्त्वाचा असा घरगुती उपाय जाणून घेणार आहोत. हा घरगुती उपाय केल्याने तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या दूर करण्यासाठी मदत होईल. चला तर मग जाणून घेऊयात या उपयोगाबद्दल..

हे वाचा:   रात्री दुधासोबत फक्त अर्धा चमचा घ्या..जोश रात्रभर कायम राहील..मुलांची उंची झटपट वाढेल..थकवा अशक्तपणा निघून जाईल..प्रभावी उपाय

हा उपाय करण्यासाठी आपल्याला दोन महत्त्वाच्या वस्तू लागणार आहेत, त्यापैकी पहिली महत्त्वाची वस्तू म्हणजे धने पावडर. घरामध्ये बनवलेली धने पावडर आपल्याला या उपायासाठी वापरायची आहे. जेवणाची चव वाढवण्यासाठी आपण कोथिंबीर केवळ धन्याची पावडर आपण वापरत असतो.

धन्यामध्ये जीवनसत्व ए ,पोटॅशियम, कॅल्शियम ,विटामिन सी इत्यादी महत्त्वपूर्ण घटक उपलब्ध असतात तसेच धन्याचे सेवन केल्यामुळे शरीरातील ग्लुकोजची पातळी सुद्धा नियंत्रणात राहते जेणेकरून चक्कर येणे, भोवळ येणे व गरगर करणे या सारख्या समस्या सुद्धा कमी होतात. या पदार्थातील मॅगनीज आणि फॉलिक ऍसिड रक्तातील कमतरता भरून काढत असतात म्हणून अनेकांना जर रक्त कमतरतेची समस्या असेल तर अशा व्यक्तींसाठी धन्याची पावडर महत्त्वाची ठरते.

त्याचबरोबर कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी रक्तवाहिन्यांमधील ब्लॉकेज व मूत्र नलिकेमध्ये ब्लॉकेज दूर करण्याचे कार्य सुद्धा धन्याच्या पावडर मध्ये असते. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक ग्लास मध्ये कोमट पाणी घेऊन त्यामध्ये एक चमचा धने पावडर टाकायची आहे यानंतर चा दुसरा घटक म्हणजे आवळा पावडर. आवळा पावडर आपल्याला कोणत्याही मेडिकल स्टोअर मध्ये सहज उपलब्ध होते. आयुर्वेदिक शास्त्रामध्ये आवळ्याला अनन्य असे साधारण महत्व आहे.

हे वाचा:   विसरभोळेपणामुळे तुम्ही खूपच अस्वस्थ आहात का.? तर करा हा एक अद्भुत उपाय.!

हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक चमचा आवळा पावडर ग्लासमध्ये टाकायची आहे आणि ग्लासमधील हे दोन्ही घटक व्यवस्थित मिक्स करायचे आहेत. आता हे मिश्रण रात्रभर किंवा सहा ते सात तास असेच झाकून ठेवायचे आहे. सहा ते सात तासानंतर हे मिश्रण तुम्ही गाळून किंवा तसेच सुद्धा पिऊ शकता.

या मिश्रणामध्ये चव वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या आवडीनुसार खडीसाखर किंवा काळे मीठ सुद्धा टाकू शकता. सकाळी उपाशीपोटी किंवा रात्री जेवणाच्या आधी हा उपाय सलग दोन ते तीन दिवस केल्यास तुमच्या शरीरातील या काही समस्या आहेत म्हणजे चक्कर येणे ,भोवळ येणे ,गरगर वाटणे या समस्या लवकरच दूर होतील.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.