चुकूनही ठेऊ नका मुलांचे हे नाव नाहीतर आयुष्यभर पश्चाताप होईल…बघा ती नावे कोणती..

ट्रेंडिंग

नमस्कार मित्रांनो,

मुलाचा किंवा मुलीचा जन्म झाला की विचार सुरू होतो आपल्या मुला-मुलींचे नाव काय ठेवायचं. बरेच पालक आपल्या मुला-मुलींचे नाव आशा प्रकारे ठेवतात की जेणे करून ते नाव सकारात्मक असावं. आपल्या हिंदू धर्मामध्ये बऱ्याच पौराणिक पात्रांचे नाव मुला-मुलींना दिले जातात. मात्र काही चरित्र पुराणामध्ये अशी आहेत की ज्यांची नाव ठेवणे लोक पसंद करत नाहीत. कारण या नावांची अनेक अपशकुन जोडलेले असतात.

आज आपण अशीच 10 नावे जाणून घेणार आहोत की जी नावे आपण चुकूनही मुलांची ठेऊ नका. नाहीतर तुम्हाला भविष्यात पश्चताप केल्या वाचून पर्याय राहणार नाही.
या पैकी पहिलं नाव आहे विभीषण याचा अर्थ कधी राग न येणारा. पण इतका चांगला अर्थ असून सुद्धा हे नाव लोक ठेवत नाहीत. कारण विभीषणाने आपला भाऊ रावण याच्या मृत्यूचे रहस्य प्रभू श्री रामाला सांगितल होत. आणि म्हणूनच विभीषणाला घराचा भेदी असे ही म्हटलं जात.

पुढचं नाव आहे मंदोदरी, मंदोदरी ही अतिशय दयाळू आणि गुणवान स्त्री होती. मात्र रावणाची पत्नी असल्यामुळे मंदोदरी नाव कोणीही मुलींना ठेऊ इच्छित नाही.
तिसरं नाव आहे द्रोपदी ही अत्यंत सुंदर अशी राजकन्या होती. मात्र तिला पाच पांडवांबरोबर लग्न करावं लागल्यामुळे कोणीही आपल्या मुलीच नाव द्रोपदी ठेवत नाही.
चौथ नाव आहे सुग्रीव हा प्रभू श्री रामाचा परम भक्त म्हणून ओळखला जातो. मात्र आपल्याच भावाच्या मृत्यूच कारण हा सुग्रीव बनला होता.

हे वाचा:   विवाहित स्त्रियांनी उघडले मोठे गुपित..लग्नानंतर ही गोष्ट केल्याने त्यांचे अंग मोठे होतात..जर पती दररोज अशाप्रकारे..

आणि म्हणून सुग्रीव हे नाव ठेवणं सुद्धा अशुभ मानल जातं. पुढचं नाव आहे अश्वत्थामा हा अतिशय साहसी बहादूर योद्धा होता. पण त्यानी अशी काही वाईट कामे केली. ज्यामुळे श्री कृष्णांनी त्याला श्राप दिला की शतकानुशतके तू पिढा सहन करत राहशील. आणि म्हणून अश्वत्थामा हे नाव सुद्धा अपशकुन मानले जाते. सहावं नाव आहे गांधारी ही एक महान स्त्री होती अतिशय गुणवान आणि गुणसंपन्न स्त्री होती.

मात्र कुरुवंशात लग्न झाल्यानंतर तिच्या वाटेला फक्त दुःख च दुःख आलं तिला शंभर पुत्र होते ज्यांना कौरव म्हणून ओळखल जातं. मात्र या शंभर पुत्रांचा मृत्यू तिला आपल्या समोर होताना पाहावं लागलं. म्हणून गांधारी हे नाव ठेवण्यास योग्य समजलं जातं नाही. पुढील नाव आहे कैकेयी हीचा सं-बंध राज परिवाराशी होता. मात्र आपल्या नौकरानीचा सल्ला ऐकून तिने आपल्या स्वतःच्या परिवारामध्ये मोठे भेद भाव निर्माण केले. यामुळे कैकेयी हे नाव सुद्धा ठेवण्यास योग्य नाही.

हे वाचा:   पावसाळ्यात इंटरनेट स्लो का चालते.? फक्त १% लोकांनाच माहितेय याचे खरे कारण.!

पुढचं नाव आहे दुर्योधन अतिशय बलवान महान असा योद्धा म्हणजे दुर्योधन होतो. मात्र लालचिपणा हा असा दुर्गुण या दुर्योधनाला जोडला गेला की ज्यामुळे आपल्या संपूर्ण परिवाचा नाश या दुर्योधनाने करून घेतला. यानंतर नाव आहे मंथरा ही मंथरा राम व सिता आणि लक्ष्मण दशरथ आणि त्यांच्या संपूर्ण परिवार यांना दुःखचा सामना करण्यास भाग पडणारी स्त्री म्हणून ओळखली जाते.

या सर्वांना मंथरा मुळे दुःखचा सामना करावा लागला. यामुळे हे नाव आपल्या मुलीचे ठेवू नये. शेवटच नाव आहे शकुनी हा शकुनी अतिशय चतुर सल्लागार होता. मात्र घृणा आणि प्रतिशोध या भावनेमध्ये त्याने कुरुवंशा मध्ये दरार निर्माण केला आणि संपूर्ण कुरुवंशाचा त्यामध्ये नाश झाला. यामुळे हे नाव सुध्दा आपण ठेवू नये. ही होती 10 नावे जी आपण चुकूनही आपल्या कुटूंबातील मुला-मुलींची ठेऊ नये.