नवरा धनवान होण्यासाठी बायकोला करावे लागतात ही 5 कामे..देवी लक्ष्मी अशा घरात साक्षात वास करते..जाणून घ्या

अध्यात्म

स्त्रीयांना घरामध्ये खुप महत्त्वाचे स्थान असते, कारण महिलांना घरची लक्ष्मी मानले जाते. तसेच त्यांच्याशिवाय घर हे पूर्ण होत नाही,असे म्हणतात. ज्या महिला ही कामे करतात त्यांच्या वै’वाहिक आयुष्यात भरपूर सुख, पैसा, संपत्ती येते. त्यामुळे ज्या घरातील स्त्रियां ही पाच कामे करतात त्या घरातील पुरुष अचानक धनवान बनू लागतात किंवा त्यांचा व्यवसाय तेजीत चालू लागतो.

कारण स्त्रीला घरची लक्ष्मी म्हटले जाते त्यामुळे जर स्त्रीने मनात आले तर ती आपल्या घराला स्वर्ग बनवू शकते तसेच जर तिच्या मनात आले तर ती आपल्या घराचा नाशही करू शकते. ज्या महिला ही 5 कामे करतात तिथे स्वतः देवी लक्ष्मीचे आगमन होते. सुखसमृद्धी संपन्न त्यांच्या घराकडे आकर्षित होते.

यामध्ये प्रामुख्याने ज्या स्त्रीला सकाळी सूर्योदयापूर्वी उठण्याची सवय असते ,तसेच त्या घराच्या स्वच्छतेकडे आणि आपल्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडत असेल तर त्या स्त्रीवर आणि घरावर भगवंताची कृपा दृष्टी पडते,असे सांगितले जाते. यामुळे तिच्या पतीला प्रत्येक कार्यात यश व सफलता प्राप्त होते.

हे वाचा:   पूजा पाठ करून देखील माणूस दुःखी का असतो.? ९९% लोकांना माहित नसलेलं सत्य.!

तसेच दुसरे कार्य म्हणजे जेव्हा एखादी स्त्री अगदी अचानकपणे देवाच्या किंवा भक्तीच्या कार्य पूर्ण श्रद्धेने करते, त्यावेळी ती सर्व देवीदेवतां तिला प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात. तसेच असे म्हणतात की ,अशा स्त्रीच्या पाठीशी स्वतः देवी माता लक्ष्मी कायम असते. त्यामुळे तिच्या पतीचा व्यापार ,व्यवसाय तेजीत चालतो व त्याला उत्पन्नाचे विविध मार्ग दिसू लागतात.

याशिवाय एखादी स्त्री जर मोठ्या व्यक्तींचा मान सन्मान करत असेल किंवा सर्वांशी आदराने वागत असेल तर तिच्या या गोड व मधुर बोलण्यामुळे सर्वजन तिच्यावर प्रेम करतात, तिला मदत करतात, तसेच देवीदेवता यांचा कृपाशीर्वाद मिळत असतो. तसेच अशा स्त्रियांच्या घरी देवी सरस्वती सूक्ष्म रूपात आपले वास्तव्य करते.

याशिवाय जी स्त्री सकाळी उठून आपल्या पतीचे पाय दाबू लागते त्यावेळी धनाचा असा प्रभाव पडतो की त्यामुळे तिचा पती धनवान होतो. कारण असे म्हटले जाते की , पुरुषांच्या पायापासून घोट्यापर्यंत चा भाग शनिदेवाचा असतो ,आणि तसेच स्त्रियांच्या हाताच्या मनगटापासून ते बोटा पर्यंतचा भाग हा शुक्र देवांचा असतो.

हे वाचा:   गरीबी आणि आर्थिक ब”र्बादी चे कारण असते अशा प्रकारचे टॉयलेट आणि बाथरूम.!

त्यामुळे ज्योतिष शास्त्रानुसार ज्या क्षणी शनिशुक्राचा प्रभाव पडतो ,त्यावेळी धनाची प्राप्ती होते. आचार्य चाणक्य म्हणतात की ज्या स्त्रीच्या अचानकपणे कोणत्याही वस्तू किंवा कार्यातील इच्छा कमी होत असतात किंवा कोणत्याही गोष्टीत अपेक्षा कमी प्रमाणात असते.त्यावेळी त्या घरात माता महालक्ष्मीचा निवास राहतो,असे म्हणतात.

त्यामुळे त्या स्त्रीचा पती धनसंपत्तीने मालामाल होऊ शकतो. त्याला प्रसिद्धी मिळते त्याला भरपूर नावलौकीक मिळत असतो. कारण जिथे अपेक्षा कमी असतात तिथे लक्ष्मी वास करते, असे अनेक पोथी-पुराणात सांगितले आहे.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.