रामबाण उपाय-नजर लागणे, दृष्ट लागणे,लहान मुलांना, मोठ्या माणसांना किंवा उद्योग धंद्याला..लगेच नजर उतरेल प्रगती होईल..

अध्यात्म

दृष्ट लागणे ही एक सामान्य बाब मानली जाते. एखाद्या व्यक्तीस दृष्ट किंवा नजर लागली की तो माणूस अस्वस्थ होत असतो. तसेच एखाद्या बाळा नजर लागली की बाळ सतत रडू लागतं. त्याला ताप चढतो. बाळ चिडचिड करू लागते. आपल्या संस्कृतीत दृष्ट काढायच्या अनेक पद्धती आहेत.

बऱ्याचदा आपण जर एखाद्या निर्जन ठिकाणाहुन आला असाल म्हणजेच अशा ठिकाणी जर तुम्ही जाऊन आला असाल किंवा लहान मुलांना घेऊन गेला असाल तर अशा वेळी सुद्धा काही वाईट शक्तीच सावट तुमच्यावर पडते आणि तुम्ही आजारी पडता. त्यामुळे विचित्र गोष्टी घडताना दिसतात. तशी याची काही लक्षणे असतात.

पहिली गोष्ट म्हणजे आपल्या घरातील लोक वारंवार आजारी पडतात किंवा डॉ-क्‍टरांना तुमच्या आजाराचे निदान सापडत नाही ,तसेच उद्योगधंद्यात नुकसानच होणे, नोकरीमध्ये अनेक अडचणी येत राहणे ही लक्षणे दिसून येतात.या गोष्टीमुळे घरातल्या एखाद्या व्यक्तीला किंवा तुमच्या घराला नजर लागलेली आहे, असे सांगितले जाते. यासाठी काही उपाय केल्यास या वाईट शक्तीचा विनाश होईल.

हे वाचा:   घरात या दिशेला चुकूनही ठेवू नये चप्पल बूट; नाहीतर घरात येऊ शकते कायमची दरिद्री.!

आपल्याला यासाठी एक कापसाची वात बनवायची आहे आणि ही वात मोहरीच्या तेलात भिजवुन घ्या, ज्या व्यक्तीला नजर लागली त्या व्यक्ती वरून 7 वेळा ती उतरवुन ती वात जाळून टाकायची, असा हा उपाय 7 दिवस सकाळ आणि संध्याकाळ करायचा आहे. यामुळे वाईट आत्म्यांचा त्रा स होणे बंद होतो.

दुसरा उपाय असा की 7 लाल मिरच्या घेऊन ज्या व्यक्तीला किंवा लहान मुलांना नजर लागली आहे अशा व्यक्तीच्या डोक्यावरून 7 मिरच्या उतरवुन एखाद्या अग्नीमध्ये टाकायच्या आहेत. हा उपाय आपण तीन दिवस केल्यास नजर दोष दूर होण्यास मदत होते.

तसेच एक अत्यंत महत्त्वाचा उपाय म्हणजे आपण एक भाकरी किंवा चपाती घेऊन मोहरीचे तेल लावून तयार करायची आहे. ज्या व्यक्तीला नजर लागली तिच्यावरून सात वेळा डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा उतरवून घ्या व गाईला खाऊ घालायची आहे. हा उपाय सात दिवस करायचा आहे.

हे वाचा:   मुलीला माहेरहून या 5 वस्तू चुकूनही भेट देवू नका; अन्यथा येईल पच्छाताप करण्याची वेळ.!

शनिवारचा किंवा शुक्रवारचा दिवस निवडून एक जाडसर चपाती बनवून त्याला मोहरीचे तेल लावावे आणि त्यावर बिन मिठाचा भात ठेवून त्या नजर लागलेल्या व्यक्तीवरून उतरून निर्जन ठिकाणी जाऊन रात्री 12 वाजता टाकून यायचे आहे. पण हा उपाय करताना कोणाशी बोलायचे नाही आणि मागे वळून पहायचं नाही. लगेच घरात येऊन हात पाय स्वच्छ धुवून घ्या.

या करणाऱ्या उपायांची नेहमीच गुप्तता ठेवावी व निर्जन ठिकाणी जाणे टाळावे.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.