बाजारात दिसताक्षणी विकत घ्या हे फळ; रक्त इतके वाढेल,की रक्तदान करावे लागेल, ॲनिमिया वर घरगुती उपचार.!

आरोग्य

अनेकदा आपल्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता असते अशा होईल आपल्याला अनेक आजार सुद्धा होण्याची शक्यता असते जर तुमच्या शरीरामध्ये रक्ताचे कमतरता असेल तर उपाय म्हणून काय करता येईल ते जाणून घेणार आहोत. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण देशातील ४७ टक्के महिलांमध्ये शरीरातील रक्त पेशींची संख्या कमी झाल्यावर ॲनिमिया होतो.

आपल्या शरीरामध्ये लोह निर्मिती निर्मिती होत असते.बहुतेक वेळा आपल्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता असेल किंवा रक्तामध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाले असल्यामुळे अनेकांना ॲनिमिया चा त्रास उद्भवू लागतो त्याचबरोबर ॲनिमिया झाल्यावर आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती खूपच कमी होऊन जाते. जर तुम्हाला ॲनिमिया झाला असेल तर अशा वेळी कोणतेही वायरल इन्फेक्शन शरीराला लगेच होते. लहान मुलांमध्ये रक्ताचे प्रमाण कमी असेल तर ॲनिमिया झाल्यामुळे त्यांची मानसिक तसेच शारीरिक वाढ सुद्धा थांबते आणि यामुळे त्यांना भविष्यामध्ये अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

लहान मुलांच्या शरीरामध्ये रक्ताचे प्रमाण कमी झाल्यामुळे अनेकांना सुस्ती व भरपूर प्रमाणामध्ये झोप लागू लागते. अनेकदा शरीरामध्ये रक्ताचे प्रमाण व हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असल्यामुळे श्वास घेण्यास सुद्धा त्रास होत असतो कारण की रक्तातील ऑक्सिजनचे पात्रता कमी झाल्यामुळे आपले फुप्फुसे सुद्धा योग्य पद्धतीने काम करत नाही आणि यामुळे श्वास घेण्यात अडथळा निर्माण होत असतो.

व्यायाम केल्यानंतर थकवा जाणवू लागतो, श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो त्याच बरोबर शरीर सुद्धा पिवळसर होऊ लागते यासारख्या अनेक समस्या ॲनिमिया झाल्यावर होऊ लागतात. ॲनिमिया हा काही आजार नाही परंतु आपल्याला ॲनिमिया झाल्यामुळे अनेक आजार उद्भवण्याची शक्यता असते म्हणूनच या लेखामध्ये आपण असे काही घरगुती उपचार जाणून घेणार आहोत त्या उपचाराच्या माध्यमातून जर तुम्हाला कोणताही प्रकारचा ॲनिमिया असेल तर तो ॲनिमिया दूर करण्यासाठी मदत होणार आहेत चला तर मग जाणून घ्यावेत याबद्दल..

हे वाचा:   शरीरातील उष्णता चुटकीत कमी करा..पित्त, छातीत जळजळ, तोंड येणे, पोटाच्या सर्व तक्रारी..आयुष्यात पुन्हा कधीच येणार नाहीत !

ॲनिमिया दूर करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा पहिला उपाय म्हणजे सफेद तीळ. सफेद तीळ मध्ये भरपूर प्रमाणामध्ये मॅग्नेशियम, कॅल्शियम व तसेच लोह यांचे प्रमाण जास्त असते. तीळ आपल्या शरीरातील रक्त वाढीसाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असते. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक वाटी तीळ अर्धा ते एक ग्लास पाण्यामध्ये भिजवून ठेवायची आहे आणि त्यानंतर मिक्‍सरच्या साह्याने त्याची पेस्ट बनवायची आहे व त्यामध्ये एक चमचा मध मिसळायचे आहे आणि हा उपाय जर आपण आठ दिवस सातत्याने केला तर यामुळे आपल्या शरीरातील रक्ताची पातळी वाढण्यासाठी मदत होते त्यानंतर दुसरा महत्त्वाचा उपाय म्हणजे काळे व हिरवे काळे चणे.

तुम्ही चणे रात्रभर भिजवून ठेवून मोड आलेले चणे सकाळी खाल्ल्याने व त्याची मिसळ किंवा भाजी बनवून खाल्ले तर तुमच्या शरीराला भरपूर प्रमाणामध्ये लोह प्राप्त होत असते त्याच बरोबर आपण भाजलेले चणे म्हणजेच जे बाजारामध्ये आपल्याला फुटाणे मिळत असतात याचा उपयोग गुळासोबत जरी केला तरी आपल्या शरीराला भरपूर प्रमाणामध्ये लोह प्राप्त होत असल्यामुळे तुमच्या शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढण्यास मदत होते.

जर तुमच्या शरीरामध्ये रक्ताचे प्रमाण कमी असेल तर अशावेळी टमाट्याचे सेवन करणे अत्यंत गरजेचे असते कारण की टमाटर च्या अंगी असे काही औषधी गुणधर्म व लोहाचे प्रमाण भरपूर असल्यामुळे आपल्या शरीरामध्ये रक्त पातळी लवकर वाढते व त्याचबरोबर दिवसातून एकदा बिटाचा रस व गाजराचा रस प्यायल्याने सुद्धा आपल्या शरीरातील रक्ताची पातळी वाढण्यास मदत होत असते त्याचबरोबर तुम्ही बिटाचा रस मध्ये काळे मीठ व मध मिसळून प्यायल्याने सुद्धा तुम्हाला उपयोग होत असतो.

हे वाचा:   या वस्तूचा उपयोग करून आपण एका रात्रीतच कमी करू शकता पोटावरची चरबी.!

आपल्या शरीरामधील लोहाचे प्रमाण कमी झाल्यावर अनेकदा डॉक्टरांकडून सुद्धा पालक खाण्याचा सल्ला दिला जातो कारण की पालक मध्ये भरपूर प्रमाणात लोह उपयुक्त असते आणि म्हणून तुम्ही पालक सूप व पालक भाजी सुद्धा खाऊ शकता त्यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे शिंगाडा. शिंगाडा मध्ये भरपूर प्रमाणात लोहाचे प्रमाण आढळून आलेले आहे. जर तुम्हाला शिंगाडा उपलब्ध झाला नाही तर बाजारामध्ये शिंगाड्याचे पीठ सुद्धा उपलब्ध होते याची तुम्ही भाकर सुद्धा बनू शकता.

वीस ते तीस काळे मनुके आपण रात्री भिजवून ठेवले व ते भिजवून ठेवलेले मनुके सकाळी खाल्ली व उरलेले पाणी सेवन केली तरी आपल्या शरीरामध्ये हिमोग्लोबिन ची पात्रता वाढण्यास मदत होते. दिवसभरातून जास्तीत जास्त व्यायाम करणे तसेच शतपावली करणे सुद्धा तुमच्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरत असते. हे सगळे उपाय केल्याने तुमच्या शरीरातील रक्ताची पातळी नियंत्रणात आहे त्याचबरोबर रक्तातील ऑक्सिजन सुद्धा नियंत्रणामध्ये राहणार आहे म्हणून आपल्या शरीरातील ॲनिमिया दूर करायचा असेल तर आपल्यालाही घरगुती उपचार करणे अत्यंत गरजेचे आहे म्हणून उपाय आवश्यक करा.