अंगाला सुटणारी खाज कितीही जास्त असुद्या या घरगुती उपायाने ३ दिवसांतच होईल मुळापासून नष्ट.!

आरोग्य

तुमच्या अंगावर कोणत्याही प्रकारची खाज असुद्या ती खाज हा उपाय केल्याने तीन दिवसांमध्ये मुळापासून नष्ट होणार आहे. तसेच खाज, खरुज, नायटा यासारख्या अन्य त्वचाविकारांवर सुद्धा हा उपाय अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असतो. अंगाला खाज सुटते,अंगावर लालसर चट्टे येतात, कधी कधी इन्फेक्शन होणे किंवा ऍलर्जी ,त्वचा कोरडी पडण्याची समस्या अशा वेळीसुद्धा अंगाला खाज सुटते या सगळ्या गोष्टींमुळे अनेकदा आपल्या व्यक्तिमत्त्वाला सुद्धा परिणाम होत असतो.

शरीरातील सौंदर्य संरक्षण करण्याचे कार्य आपली त्वचा करत असते.आपल्या शरीरातील जे काही विषारी घटक बाहेर टाकण्याचे कार्य आपली त्वचा करत असते. अनेकदा सूक्ष्म विषाणूमुळे खाज पायापासून ते अंगापर्यंत वेगवेगळ्या भागांवर हळूहळू सुटत असते आणि परिणामी नंतर काही काळात गंभीर स्वरूप सुद्धा निर्माण करत असते म्हणून जर तुमच्या सुद्धा अंगाला खाज सुटत असेल तर त्यावर उपचार करणे अत्यंत गरजेचे आहे अन्यथा भविष्यात तुम्हाला परिणाम सुद्धा भोगावे लागू शकतील.

हे वाचा:   फक्त १ वेळा अंघोळी आधी हे पीठ लावा; वांग,काळे डाग गायब होऊन चेहऱ्यावर नवरीसारखा ग्लो येईल.!

म्हणूनच आजच्या लेखामध्ये आपण असा एक उपाय जाणार आहोत.हा उपाय फक्त तीन दिवस जरी केला तरी तुमच्या अंगावर येणारी खाज पूर्णपणे दूर होणार आहे. हा उपाय करण्यासठी आपल्याला दही लागणार आहे. दही ड्राई स्किन कोरडी त्वचा साठी खूप उपयुक्त असते शिवाय त्वचेवरील मृतपेशी आहे त्या बाहेर काढून टाकण्यासाठी ,कोरडेपणा कमी करण्यासाठी उपयोगी ठरते.

हा उपाय करण्यासठी दुसरा पदार्थ आपल्याला वापरायचे आहे ते म्हणजे कडुलिंबाची पाने. कडू लिंबाच्या पानांना अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेले आहे यातील औषधी गुणधर्मामुळे शरीरावरील अनेक विषाणू कीटक दूर करण्यासाठी या पानांचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. या कडूलिंबाच्या पाण्यामध्ये अँटी फंगल,अँटीबॅक्टरियल गुणधर्म असतात.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला वीस ते पंचवीस कडुनिंबाची पाने घ्यायची आहे आणि त्यामध्ये दोन ते तीन चमचा दही टाकायचे आहे आणि त्यानंतर या मिश्रणाची पेस्ट बनवायची आहे. ही पेस्ट तयार झाल्यानंतर ज्या ठिकाणी तुम्हाला खाज खरुज आहे अशा प्रभावित जागेवर लावायचा आहे.हा उपाय आपल्याला तीन दिवस करायचा आहे. दिवसभरातून दोन वेळा तरी तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या शरीरावरील खाज पूर्णपणे दूर होऊन जाणार आहे त्याचबरोबर हा अत्यंत आयुर्वेदिक उपचार असल्याने या उपचाराने तुमच्या शरीरावर कोणत्या प्रकारचे दुष्परिणाम सुद्धा होणार नाही म्हणून हा उपाय अवश्य करा.

हे वाचा:   एकदाच हे पान असे चावा; एका मिनिटांतच पिवळे दात मोत्यासारखे चमकतील.!

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.