दुकान चालत नसेल तर करा हा उपाय…लोकांना आपल्या दुकानाकडे खेचण्याचा गुप्त उपाय..

अध्यात्म

नमस्कार मित्रानो,

तुमच्या सर्वांचे आपल्याआवडत्या मराठी पेजवर खूप स्वागत आहे.आपल्या मानवाच्या काही गरजा असतात. अन्न,पाणी,निवारा या जगण्यासाठी मुलभूत गरजा आहे. आपण आपला चरितार्थ चालवण्यासाठी नोकरी आणि व्यवसाय करत असतो. मेहनत करून आपण आपल्या संसारला आणि घराला हातभार लावत असतो.

व्यवसाय उत्तम चालण्यासाठी ग्राहक असायला पाहिजेत.ग्राहकांची संख्या जास्त असेल आणि तुमच्या दुकानातील वस्तूंची विक्री होत असेल तर आपल्याला फायदा होतो.व्यवसायात जम बसण्यासाठी थोडा कलावधी लागतो. आपल्याकडे कामाला हुशार माणसे असतात. काही कारणामुळे धंदा हवा तसा होत नाही. यामध्ये वास्तू दोष देखील असू शकते. यामुळे तुमचा धंदा कमी होतो. यामुळे तुमच्या जीवनात पैशाची कमतरता निर्माण होते.

तुम्हाला जर तुमच्या जीवनात आणि व्यवसायात प्रगती करायचे असेल तर या लेखामध्ये खूप महत्वाची माहिती सांगणार आहोत. पहिला उपाय म्हणजे दुकान उघडण्यापूर्वी १०८ वेळा हा मंत्र तुम्हाला जप करायचा आहे. या मंत्राला सिद्ध करण्याची आवश्यकता नसते. रोज या मंत्राचे १०८ वेळा नाम स्मरण करून तुम्ही तुमचा व्यवसाय सुरु शकता.तो मत्र खूप सोपा आणि सरळ आहे. तो मंत्र श्री महालक्ष्मी नमः असा आहे.

हे वाचा:   अशा प्रकारे आपल्या कुटुंबाला त्रास देतात...देवाघरी गेलेली माणसं...हे उपाय आपणास वाचवतील

दर रविवारी हातामध्ये उडीद घेवून या मंत्राचे पठन करावे. जप केलेले उडीद दुकानात आणि दुकानाच्या बाहेर टाकून द्यावे.यामुळे तुमचा व्यवसाय उत्तम चालेल. तुमची प्रगती तर नक्कीच होईल. सतत लक्ष्मी मातेच्या नाम स्मरणामुळे देवी देखील तुमच्यावर प्रसन्न राहील.शुक्रवारी लक्ष्मी मातेची पूजा करून तिला नैवेद्य अर्पण करावे. त्याचबरोबर गरजू व्यक्तीला दान करावे.

आपल्या व्यवसायात काही अडचणी निर्माण होतात. व्यवसायातील काही अडचणी दूर करण्यासाठी ११ शनिवारी ११लवंगाची माळ एखादी योग्य वेळ ठरवून श्री पंचमुखी हनुमंतास घातल्याने व्यवसायातील अडचणी दूर होतील. दर शनिवारी हनुमान चालीसेचे पठन देखील करावे.

असे केल्यामुळे तुमच्या व्यवसायात आणि नोकरीत तुमची प्रगती होईल.तुमच्या जीवनात सुख शांती आणि समृद्धीची वृद्धी होईल. वरील माहिती आवडल्यास लाईक करून तुमच्या प्रतिक्रिया कळवा, धन्यवाद.

हे वाचा:   रविवारी गाईला पोळी सोबत खाऊ घाला ही थोडीशी वस्तू; आयुष्यात अपार सुख व धन मिळत राहील.!