रक्ताच्या गुठळ्या किंवा ब्लॉक नस पुन्हा सुरळीत करण्यासाठी हे १ पान अशाप्रकारे वापरा…हृदयातील ब्लॉकेज पूर्णपणे दूर..

आरोग्य

नमस्कार मित्रांनो. नेहमी प्रमाणे आजही आम्ही आपणासाठी घेऊन आलो आहोत एक नवीन माहिती जी आपल्याला अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. कसल्याही प्रकारची नस दबलेली असेल, रक्ताच्या गुठळ्या बनत असतील, किंवा paralysis तुम्हाला अटॅक आला असेल, किंवा तोंडाचा कॅन्सर होऊ नये असे वाटत असेल तर वर्षभरामधून फक्त ५ दिवस हा उपाय करा.

तुमची ब्लॉक झालेली नस मोकळी होईल रक्त घट्ट असेल तर ते पातळ होईल. ज्या व्यक्तींना paralysis झाला आहे आणि त्यांना खाता येत नाही तर त्यांनी हा उपाय कसा करावा याबद्दल देखील आम्ही पुढे तुम्हाला सांगणार आहोत. हा उपाय जर तुम्ही आम्ही सांगितलेल्या पद्धतीने करणे खूप महत्वाचे आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार पहिला घटक म्हणजे खाऊचे पान.

“खाऊच्या पानाला आयुर्वेदामध्ये अत्यंत महत्त्वाचा घटक मानला आहे, हृदयाशी संबंधित असो किंवा फुफुसाशी सं-बंधित असो त्यासाठी पान हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. असे हे खाऊचे पान या उपायासाठी फक्त एकच घ्यावे लागणार आहे. आशा या पानाचा देट आणि शेंडा कापून टाका व त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.. नंतर त्यामध्ये लागणार दुसरा घटक म्हणजे लसूण.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला लसूण जाळावरती भाजून घ्यावा. लसूण हा शरीरामधील अनेक आजारांवर अत्यंत महत्वाचा घटक आहे, विशेषतः जर तुमचे रक्त घट्ट असेल, तुमच्या रक्ताच्या गुठळ्या बनत असतील, आणि त्यामुळे तुमच्या नसा बंद होत असतील तर त्यासाठी हा लसूण अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.. हृदय रोगाशी संबंधित समस्या असतील, बायपास झालेले असेल, किंवा कोणताही हृदय रोग असेल तर हा उपाय तुम्ही अवश्य कराच.

हे वाचा:   नाकाचे वाढलेले हाड १ दिवसातच करेल कमी; करा हा रामबाण घरगुती उपाय.!

लसूण का घ्यायचा तर लसूण हृदयातील ब्लॉकेज काढतो, नसांमधील ब्लॉकेज काढतो, रक्त पातळ करतो. उपाय करण्यासाठी अशा या गुणकारी लसूणचे प्रमाण दोन पाकळ्या इतके घ्यावे. नंतर लागणार तिसरा घटक म्हणजे आले. आले देखील विविध प्रकारच्या समस्यांसाठी अत्यंत महत्वाचा घटक आहे.

आले हे पाचक आहे, त्याच बरोबर आले शरीरातील वात, कप, पित्त कमी करण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. त्याच बरोबर नसांशी सं-बंधित ज्या समस्या असतात त्यासाठी देखील आले हे अत्यंत गुणकार आहे आशा या आल्याचे प्रमाण हरभऱ्याच्या डाळी एवढे घ्यायचे आहे. या पानावर घ्यायचा पुढील घटक म्हणजे मध.. याचे प्रमाण आहे एक चमचा.

मधात अनेक प्रकारच्या झाडांचे गुणधर्म असतात. त्याच बरोबर या उपायामध्ये मधाचा वापर केल्याने आल्याचा आणि लसूणचा जो तिकट स्वाद असतो तो देखील लागणार नाही. परंतु ज्यांना शुगर आहे त्यांनी मध न वापरता हा उपाय केला तरी चालेल. नंतर या उपायसाठी लागणार चौथा घटक आहे तो म्हणजे जिरे. “याचे प्रमाण अर्धा चमचा एवढे घ्यावे”, जिरे हे तोंडातील आजारांसाठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.

बऱ्याच लोकांना तंबाखू खाण्याचे पान सुपारी खाण्याचे व्यसन असते ही व्यसने आपण लवकरात लवकर सोडली पाहिजेत कारण यामुळे माऊथ कॅन्सर ची देखील भीती असते. त्याच बरोबर तोंडामध्ये फोड येणे, तोंड येणे आशा सर्व समस्या होतात. यासाठी जिरे अत्यंत उपयुक्त आहेत. या मिश्रणामध्ये जिरे मिक्स केल्याने नसांमधील ब्लॉकेज काढण्यासाठी हे अत्यंत उपयुक्त ठरते. वरील सर्व घटक म्हणजे लसूण, आले, मध हे सर्व घटक एका खाऊच्या पानामध्ये ठेऊन त्याचा विडा करा व हा विडा सकाळी उपाशीपोटी खा व त्यानंतर १५ ते २० मिनिटे त्यावरती काहीही खाऊ नका किंवा पाणी देखील पिऊ नका.

हे वाचा:   जगाने लाजाळू वनस्पतीच्या सामर्थ्याकडे पाहिलंय; मु’ळ’व्याध, मु’त’ख’डा, या सारखे आजार होतील लगेच दूर.!

ज्यांना पॅरालीसीस मुळे हा विडा खाता येणार नाही त्यांच्यासाठी मध सोडता बाकी सर्व घटक खलबत्त्यात चांगले कुटावे त्यात एक चमचा मध मिसळावा आणि त्यांनाच चाटण्यासाठी द्यावे. हा उपाय तुम्ही ५ ते ६ दिवस करा, यामुळे नसांमधील ब्लॉकेज निघून जाईल, रक्तातील गुठळ्या पुर्णपणे निघून जातील, रक्त पातळ बनेल, हृदय विकाराचा धो’का आयुष्यात कधीही राहणार नाही,

त्याच बरोबर तोंडातील कोणतीही समस्या राहणार नाही, असा हा गुणकारी व करण्यासाठी अत्यंत सोपा असा उपाय तुम्ही नक्की करून पाहा. आणि माहिती आवडल्यास तुमच्या नातेवाईकांना देखील शेअर करा. आम्ही दिलेली माहिती ही आयुर्वेदाच्या सामान्य सिद्धांतांवर आधारित असते कृपया याचा उपयोग करण्यापूर्वी एकदा तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.