अंगावर शहारे येईल असा बाळंतपणाचा अनुभव..बघा स्वामींनी कसे संकटातून बाहेर काढले..एक सत्य घटना..

अध्यात्म

यशोदा मामी प्रत्येक कामात असताना त्यांचे स्वामींचे नामस्मरण चालू असे, आज भल्या पहाटेपासून त्यांनी गुरू चरित्राचे वाचन देखील केले आणि नामाचा जप तर अखंड चालु होते. यांच्या घराला देव ध र्म हा काही नवीन नव्हता. दहा-बारा वर्षांपूर्वी मामांनी अक्कलकोटला नेले होते, तेव्हापासून मामींना स्वामींची ओढ लागली ती लागली. म्हणजे या गावाच्या मामीच होत्या.

गोल चेहरा ,नाकी-डोळी नीटसर, उजळलेला सावळा रंग, अंगावरची नऊवारी साडी आणि कपाळावर आठाणी एवढे कुंकू. व्यक्तिमत्व अख्या गावाला माहीती होते. सकाळपासून किंबहुना काल रात्रीपासूनच मामी जरा अस्वस्थ होत्या. गेली दोन दिवस कधी नव्हे असा मुसळधार पाऊस चालू होता, बरे पावसाचे काही नाही पण घरात अवघडलेली सून शांता ! तिला सरकारी दवाखान्यात घेऊन गेल्या पण तिथल्या नर्स म्हणाल्या की इथे उपकेंद्रात बाळंतपण होण्यासारखे दिसत नाही कारण बाळ फिरलेले दिसते. तालुक्याला न्यावे लागेल.

तेव्हापासून मामींच्या डोळ्याला डोळा नव्हता कारण शांताचे दिवस भरले होते, कालपासून गावाबाहेरचा ओढा तुडुंब वाहत होता ,इकडचा तिकडे तिकडचा इकडे येत नव्हता. गाडीची व्यवस्था झाली होती पण जाणार कसे. वरून शांताला आज सकाळपासूनच पोटात दुखायला लागले होते. तिला कळा यायला लागल्या, तिकडे मामा देखील चिंतेत होते.

मुलगा काल पलीकडे गावाला गेलेला होता तो तिकडेच अडकलेला आणि त्यात सून बाईंचे भरलेले दिवस, गाडीची सोय देखील केली पण जाणार कोण? अस्वस्थ मामा वाड्यात येरझाऱ्या घालत होते, उपाय म्हणून मामींनी गावातल्या जुन्या सुईनीला निरोप धा’डला होता, भल्या पहाटे पांडू निरोप घेऊन गेला होता, पण ती जागेवर नव्हती तर आजूबाजूला ताबडतोब सांगून तो देखील बिचारा परत आला होता.

हे वाचा:   शंखाचे हे चमत्कारिक रहस्य ऐकून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल.!

दहा बारा वर्षांपूर्वी एकदा काही सुविधा नसल्याने आपल्या मुलीचे घरीच बाळंतपण केले होते पण आज ही स्थिती नव्हती. त्यावेळी सगळी बाळंतपण घरीच व्हायची. आता वयाने थरथरणाऱ्या हातांनी बाळंतपण करणे जमणार नव्हते तरी देखील त्या खंबीर बाईने सगळी तयारी करून ठेवली होती. सुती कपडे, गरम पाणी आणि नाळ का-पायला ब्ले ड पान देखील.

माझ्या स्वामिनी जर तशी वेळ आणली तर त्यांच्यावर भार सोपवून ती सगळे करणार होती. देवाचा धावा करत मामा सुनेच्या खोलीबाहेर अस्वस्थपणे उभे होती, त्यांनी पुन्हा एकदा पांडूला बघून यायला सांगितले, काही वेळात पांडू देखील हात ह’लवत परत आला ! कोणी आहे का घरी? बाहेरून बाईचा आवाज आला, सुईन आली म्हणून मामी आनंदाने बाहेर पळाल्या. पण बाहेर दुसरेच कोणीतरी होती.

एखाद्या घरंदाज घरातील वाटावी आणि चेहरा चंदनासारखा नितळ, विचारले तर ती म्हणाली मामीने पाठवले आहे, म्हातारपणी त्यांच्यापेक्षा हे काम मी चांगलं करील म्हणून. आता जीव भांड्यात पडला, त्यांनी आनंदाने तिला पायावर पाणी घ्यायला लावून घरात घेतले, मामींनी सगळी पूर्वतयारी आधीच करून ठेवली होती. आता मामा-मामी दोघांनाही बरे वाटले होते.

बराच वेळ शांताच्या ओरडण्याचा आवाज बाहेर येत होता. पण त्यापाठोपाठ लहानग्याचा देखील. वाड्यात तसे मामा खुर्चीवर बसले काय करू आणि काय नाही असे झाले होते, बाळ फिरले होते पण डॉ-क्टरांना जमणार नाही अशा पद्धतीने बाळंतपण केले होते, बाहेर येत मामींनी गोड बातमी मामांना दिली आणि शांता व मुल दोघेही सुखरूप आहेत सांगितले, सगळं काही व्यवस्थित करून ती सुईन निघाली.

हे वाचा:   वटपौर्णिमेपासून या राशींवर धनवर्षाव होईल...या राशींना आता राजयोग सुरु..दिवस बदलणार

तेव्हा मामींनी चहा टाकला आणि म्हणाल्या तुला कधी गावात नाही पाहिले. तेव्हा ती म्हणाली की राजश्री माताजींच्या लांबच्या नात्यातील आहे, चहा नंतर मग ओटी भरून घे असे म्हटले. पण नंतर येते म्हणून सांगितले आणि निघून गेली तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे मामी पाहतच राहिल्या.

दिवस मावळतीला आला होता आणि दुपारपासून पाऊस कमी झाला होता , बाळकृष्ण आता छान झोपला होता, मामाचा मुलगा एका बाईला गाडीवर गडबडीने घेऊन आलेला होता, बायकोला कळा येत आहेत हे त्याला कळले होते आणि उशीर नको म्हणून ओढ्याचे पाणी जरा कमी झाले तसे त्याने पलीकडे अडकलेल्या सुईनी बाईला गाडीवर बसवले आणि लगबगीने घरी पोहचला. सगळ्यांचे चेहरे बघून त्यालाही बरे वाटले,

मामींनी सगळी गोष्ट सांगितली तेव्हा म्हातारी म्हणाली, येणार होते पण काय सांगू मी, कशी येणार होते आणि तुम्ही म्हणता तशी कोण काय नाही बाई माझ्अंगावर शहारे येईल असा बाळंतपणाचा अनुभव.या नात्यात ! मामा आणि मामी एकमेकांकडे पहातच राहिले, पांडू म्हणाला की जेव्हा तो गेला तेव्हा घर बंद होते आणि कोणी नव्हतं .

मामी लगेच गेल्या आणि स्वामींपुढे साखर ठेवली आणि म्हणाल्या महाराज ! भक्तांसाठी तुम्ही अन्नपूर्णा देवीचे रुप घेतले होते, आज पुन्हा सुईनीचं रूप घेऊन तुम्ही माझ्या सुनेला सोडवली, माझ्या नातवाचे मोठे भाग्यच म्हणावे लागेल की जनमताच स्वामींचे हात त्याला लागले. चिंब भिजलेल्या डोळ्यांनी मामी अनेक तास स्वामींच्या समोरच बसून होत्या.

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ