आयुष्यात या ५ चुका करत असाल तर तुम्ही कधीही श्रीमंत बनणार नाही.!

अध्यात्म

अनेक वेळा आपण खूप मेहनत करतो पण काही केल्या गरिबी दूर होत नाही .अनेकजण असे विचारतात की मी गरीब का आहे ? तर हा लेख नक्की वाचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तुमच्यात असलेले या चुकांमुळे तुमच्याकडे पैसा टिकत नाही. समुद्रमंथनाच्या वेळी त्यातून निघालेले चौदा रत्नं मधील एक रत्न म्हणजे माता लक्ष्मी यांची निर्मिती झाल्याचे म्हटले जाते. असे म्हणतात की लक्ष्मी कधीही जास्त दिवस एका ठिकाणी किंवा एका व्यक्तीकडे स्थायी राहत नाही म्हणून लक्ष्मी वर लक्ष ठेवणे खूप महत्त्वाचे आहे.

जिथे लक्ष्मी असते तिथे पैसा भरपूर असतो. पैसा ही आजच्या जीवनामध्ये मनुष्याच्या दुःखाचे सर्वात मोठे कारण आहे. हे सर्व दुःखाचे कारण खरे तर आपल्या चुकीच्या सवयी मुळेच घडत असतात आणि त्यामुळेच आपल्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते आणि परिणामी माता महालक्ष्मी आपल्या जीवनातून कायमस्वरूपी निघून जाते. या सवयी सोडायला पाहिजेत ते आपल्याला कंगाल बनवतात व आपल्या श्रीमंत होण्याचा सर्वात मोठा अडथळा निर्माण करतात, चला तर पाहूया त्या सवयी ज्या तुम्हाला दरिद्री बनवतात.

माता लक्ष्मी विशेष करून ज्या ठिकाणी वास करतात तिथे प्रसन्न सुगंधित स्वच्छ वातावरण असते. ज्या घरामध्ये नेहमी दुर्गंधी असते अशा ठिकाणी माता महालक्ष्मी कधीच वास करत नाही. अशा घरांमध्ये राहणाऱ्या व्यक्तींची सर्व कार्य बिघडतात आणि त्यांच्या जीवनामध्ये नेहमी संकटे अडचणी वारंवार येऊ लागतात. आपल्या घरामध्ये दारिद्रता येण्याचे हे सर्वात मोठे कारण आहे.

हे वाचा:   रविवारी गाईला पोळी सोबत खाऊ घाला ही थोडीशी वस्तू; आयुष्यात अपार सुख व धन मिळत राहील.!

यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे श्रीकृष्ण असे म्हणतात की ज्या घरांमध्ये वडीलधार्‍या माणसांचा मान ठेवला जात नाही ,गुरूंचा सन्मान केला जात नाही व घरातील सदस्य सोबत योग्य वर्तन केले जात नाही अशा घरांमध्ये ईश्वर कधीच वास्तव्य करत नाही आणि म्हणूनच ईश्वराची कृपा आपल्यावर होत नाही परिणामी आपल्यावर लक्ष्मी कृपा राहत नाही म्हणून आपल्या जीवनामध्ये नेहमी संकटे आणि अडचणी येत राहतात.

अशा प्रकारच्या घरांमध्ये नेहमी गरिबी व कंगाली वास्तव्य करते. आपल्यापैकी अनेक जण पूजा करताना अनेक चुका करतात आणि या चुकाचे फळ त्यांना नंतर भोगावे लागतात म्हणून देवपूजा करत असताना आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणे सुद्धा अत्यंत गरजेचे आहे. पूजा करताना आपले देव घर नेहमी स्वच्छ असायला हवे त्याचबरोबर पूजा करताना कधीच आळस करू नये यामुळे परमेश्वर आपल्यावर नाराज होतात.

अनेकदा लोक बाहेरून आल्यावर घरा मध्ये तसेच प्रवेश करतात व हात पाय पाण्याने न धुता तसेच अंथरुणावर बसतात व आडवे होतात असे केल्याने आपल्या घरामध्ये अनेक वेळा एकामागोमाग एक नकारात्मक शक्ती प्रवेश करत असते तर या गोष्टी आपल्याला थांबवायचे असेल तर बाहेरून आल्यावर आधी आपल्याला हात-पाय स्वच्छ धुवायला हवेत त्यानंतरच आपल्या अंथरुणावर बसायला हवे. जेव्हा पण बाहेरून आल्यावर हातपाय धुतो तेव्हा आपल्या सोबत आलेले नकारात्मक शक्ती सुद्धा नष्ट होऊन जाते आणि आपल्यासोबत सकारात्मक ऊर्जा वास्तव्य करू लागते.

हे वाचा:   शुक्रवारच्या रात्री करा हे उपाय..माता लक्ष्मी होईल प्रसन्न..घरात सुख शांती येवून होईल पैशाचा वर्षाव..

आपल्या घरासमोर जर एखादी चक्कर उलटी असेल तर यामुळे सुद्धा गरिबी निर्माण होत असते. जर तुम्हाला सुद्धा एखादी चप्पल उलटी दिसलेली असेल तर तिला सरळ अवश्य करा. आपले स्वयंपाक घर नेहमी स्वच्छ ठेवा कारण की आपल्या घरामध्ये माता अन्नपूर्णा आणि माता महालक्ष्मी नेहमी वास्तव्य करत असतात. जर तुम्हाला वाटत असेल की दोन्ही देवींची कृपा आपल्यावर असायला हवी तर आपल्या घरातील स्वयंपाक घर नेहमी स्वच्छ असायला हवे.

अशा ठिकाणी माता महालक्ष्मी निवास करतात व आपला कृपाशीर्वाद प्रदान करतात. जी व्यक्ती सूर्योदयापूर्वी उठते अशा व्यक्तीच्या जीवनात नेहमी सकारात्मक उर्जेचा संचार होतो तेव्हा तुम्हाला नेहमी प्रगती होण्याची शक्यता असते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.