हे दोन पदार्थ म्हणजे रक्त बनवण्याची मशीनच, जाणून घ्या केव्हा करायला हवे याचे सेवन..अतिशय उपयोगी माहिती..

आरोग्य

हिवाळा हा ऋतु आपल्या आरोग्यासाठी अत्यंत चांगला ऋतू मानला जातो. हिवाळ्यामध्ये आपल्याला अनेक पौष्टिक पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण हिवाळ्यामध्ये पचन चांगल्या प्रकारे होते असे मानले जाते. सध्या हिवाळा हा ऋतू सुरू आहे. हिवाळ्यामध्ये जास्त प्रमाणात सेवन करायला सांगितले जाते ते म्हणजे शेंगदाणे आणि गूळ. शेंगदाण्याची चिक्की, लाडू नियमित सेवन करायला आता हरकत नाही.

याचे नियमित स्वरुपात सेवन करावे. आरोग्यासाठी देखील याचे विशेष असे फायदे सांगितले जातात. यामुळे अनेक शारीरिक समस्या दूर केल्या जाऊ शकतात. आजच्या या लेखामध्ये आपण याबाबतची अशी महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ही माहिती तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त असणार आहे. मित्रांनो या लेखामुळे आपणास भरपूर असा फायदा होणार आहे तरी हा लेख कृपया पूर्ण वाचावा.

तर मित्रांनो जे शेंगदाणे असतात त्यामध्ये लोह, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम भरपूर प्रमाणात असतात. याबरोबरच आपण गुळा विषयी बोलले तर यामध्ये देखील लोह भरपूर प्रमाणात सामावलेले असते. ज्यामुळे खूप शारीरिक लाभ आपल्याला होत असतो.

हे वाचा:   दररोज दोन अंजीर खाण्याचे “हे” चमत्कारी फायदे बघून तुम्हीसुद्धा आश्चर्यचकित व्हाल.!

अनेक वेळा घरामध्ये अशा व्यक्ती असतात ज्यांना विसरण्याचा आजार असतो.अनेक लोकांना विसरभोळेपणा खूप असतो अशी समस्या वृद्ध लोकांमध्ये जास्त दिसून येत असते. परंतु वृद्ध नसलेल्या काही लोकांमध्ये देखील ही समस्या दिसून येत असते. अशा वेळी तुम्ही या दोन्ही पदार्थांचे सेवन केले तर मेंदू हा चांगल्या प्रकारे कार्यरत होतो व विसरभोळेपणा हा हळूहळू कमी होऊ लागतो. त्यामुळे याचे सेवन तुम्ही नक्की करायला हवे.

ज्या लोकांना मधुमेहाचा त्रास आहे अशा लोकांनी शेंगदाण्याचे सेवन करायला हवे. शेंगदाण्यांमध्ये असे घटक असतात जे मधुमेहाला नियंत्रणात ठेवण्यास मदत करत असतात. यामुळे तुमचा मधुमेह हा पूर्णपणे नियंत्रणात राहील. शेंगदाण्यात प्रोटीनचे प्रमाण चांगले असते. त्यामुळे त्वचा, केस खूपच सुंदर होत असतात.

हे वाचा:   बाजरीची भाकरी खाण्याचे आ'रोग्यवर्धक फायदे जाणून घ्या..१०० वर्षे जगाल..आयुष्यात कधी हार्ट, बिपी, पोटाचा त्रास होणार नाही..

शेंगदाण्यात असलेल्या कॅल्शियम मुळे आपले दात हे मजबूत बनले जातात. याबरोबरच हाडे देखील मजबूत बनत असतात. ज्या लोकांच्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता भासत असेल अशा लोकांनी याचे सेवन करायला हवे. यामुळे रक्तप्रवाह चांगला होत असतो. त्याच बरोबर यामुळे रक्त देखील वाढते म्हणजेच रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढते.

अशा प्रकारे तुम्ही हिवाळा सुरू झाल्यानंतर गुळ व शेंगदाणे याचे सेवन करावे व आपले आ’रोग्य हे चांगले बनवावे. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.