कलियुगात भाग्यवान महिलांच्या शरीरावर दिसतात ही 9 लक्षणे; महालक्ष्मी चे रूप असतात अशा महिला.!

अध्यात्म

असे म्हणतात की प्रत्येक पुरूषाच्या यशांमध्ये स्त्रीचा हात असतो आणि प्रत्येक पुरुषाला असे वाटत असते की आपले ज्या मुली सोबत लग्न होणार आहे ,जी मुलगी आपल्या आयुष्यात येणार आहे ती अत्यंत भाग्यशाली असावी. तिच्या पवित्र पावलाने आपले जीवन उज्ज्वल व्हावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्या मुलीने आपल्या घरच्यांची काळजी घ्यावी व आपल्या जीवनामध्ये आनंद आणावा अशी आपली माफक अपेक्षा असते.

काही पुरुषांच्या बाबतीत हे खरे सुद्धा होते आणि त्यांच्या जीवनामध्ये आलेल्या व्यक्ती मुळे त्यांचे जीवन व त्यांचे घर स्वर्ग बनते. त्यांच्या येण्यामुळे घर आनंदी बनते. समुद्र पुराणांमध्ये अशा व्यक्तींबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत. ज्या स्त्री च्या अंगी हे गुण असतात त्या स्त्रिया लग्न झाल्यानंतर ज्या घरी जातात त्या घराला स्वर्ग बनवतात.

त्यातील पहिली गोष्ट म्हणजे धार्मिक गोष्टींना महत्त्व देणारी स्त्री.जी स्त्री धार्मिक गोष्टींना अधिक महत्त्व देते. देवांची पूजा अर्चना करते. सकाळ-संध्याकाळ देवांची मनोभावे आराधना करते, अशी स्त्री सात्विक स्वभावाची मानली जाते आणि या स्त्रीच्या अंगी असणाऱ्या गुणधर्मामुळे त्या घरांमध्ये नेहमी सुख शांती वैभव सुद्धा नांदू लागते. दुसरे लक्षण म्हणजे संयमी वृत्ती व समाधानी वृत्ती.

जी स्त्री छोट्या-छोट्या गोष्टीने समाधानी होते अशा प्रकारच्या स्त्रिया अत्यंत चांगल्या मानल्यावजातात कारण की अशा प्रकारच्या स्त्रिया आपल्या पतीकडून कोणत्याच प्रकारचा अपेक्षा ठेवत नाही आणि यामुळे जर पतीकडून कोणत्या गोष्टीची कमतरता निर्माण झाली तर अशा स्त्रिया वाद सुद्धा घालत नाही आणि ज्या स्त्री संयमी व समाधानी असा त्यांच्या घरामध्ये नेहमी शांतता असते. कोणत्या प्रकारचे भांडण कधीच होत नाही.

हे वाचा:   अशा गुणांची मुलगी जर तुमच्या आयुष्यात आली तर त्या मुलीशी नक्कीच लग्न करा.!

आपल्या आजूबाजूला अश्या काही स्त्रिया असतात ज्या शेजारी ने काही नवीन वस्तू आणली तर आपल्या घरात सुद्धा ही वस्तू असावी असा हट्ट धरत असतात आणि आपल्या पत्नीची लाड पुरवत अनेक पतींच्या नाकीनऊ येऊन जातात. त्यानंतरचा गुण म्हणजे स्त्री धाडशी असावी. कोणतीही परिस्थिती निर्माण झाली तर त्या सध्याच्या परिस्थितीमध्ये धाडशी वृत्तीने दोन हात करणारी असावी, त्या परिस्थितीला धीराने सामोरी जाणारी असावी अशा प्रकारचे गुण असतात ती स्त्री त्यांच्या कुटुंबाला नेहमी संकटातून वाचविण्यासाठी सक्षम असते.

त्यानंतर ची लक्षण म्हणजे राग नाही येणारी स्त्री. अशी स्त्री आपल्याला क्वचितच भेटेल की ज्या स्त्रीला राग येत नाही.राग येणे हा प्रत्येक स्त्रीचा मूळ स्वभाव असतो परंतु जास्त प्रमाणात राग नसावा ज्या स्त्रीला जास्त प्रमाणामध्ये राग येतो, जी स्त्री नेहमी कर्कश आवाजामध्ये बोलत असते अशा घरांमध्ये नेहमी भांडणे होत असतात. अशा घरांमध्ये माता महालक्ष्मी सुद्धा जास्त काळ राहणे पसंत करत नाही म्हणून घरातील स्त्रीने जास्त न रागवता सगळ्या गोष्टी संयमाने हाताळायला हवेत. त्यानंतर ची लक्षण म्हणजे ज्या घरातील स्त्री समजदार असते त्या घरांमध्ये नेहमी चांगल्या गोष्टी घडत असतात.

आपल्या घरामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या आहेत ज्या नाही त्यांनाही तसे स्पष्टपणे समजून घेऊन आपल्या पतीसोबत संसार करते अशा प्रकारची स्त्री अत्यंत भाग्यशाली असते व अशा प्रकारचे स्त्री आपल्या कुटुंबाला नेहमी समजून घेत असते कारण की घरातली स्त्री समजूतदार असणे अत्यंत गरजेचे आहे कारण की संसारांमध्ये अनेकदा अशा काही परिस्थिती निर्माण होत असतात त्या परिस्थितीमध्ये एकमेकांना समजून घेणे अत्यंत गरजेचे ठरते.

हे वाचा:   23 मे भागवत एकादशी: या दिवशी चुकूनही हे पदार्थ खाऊ नका..तुमचे सगळे पुण्य नष्ट होतील..मोठे पाप लागते !

ज्या स्त्रियांचा स्वभाव गोड असतो अशा प्रकारच्या स्त्रिया आपल्या घरातील सदस्यांशी नेहमी चांगले वर्तन करत असतात आणि आपल्या गोड स्वभावामुळे सगळ्यांचे मन सुद्धा जिंकत असतात व या स्त्रिया आपल्या शेजारी सोबत चांगल्या वर्तनामुळे सगळ्यांच्या मनामध्ये आपले स्थान निर्माण करत असतात म्हणूनच शेजारीपाजारी सुद्धा अशा प्रकारच्या महिलांसाठी व त्यांच्या कुटुंबासाठी नेहमीच अडीअडचणी साठी धावून येत असतात परंतु जी स्त्री रागीष्ट असते कडू स्वभावाची असते चांगल्या तोंडाची नसते अशा स्त्रीबद्दल लोक वाईट बोलत असतात व अशा प्रकारच्या स्त्रियांना संकटामध्ये कोणीच मदत करत नाही.

ज्या स्त्री च्या तळ पायावर त्रिकोणी आकार असतो ति स्त्री खूपच भाग्यशाली समजली जाते. ज्या स्त्रीचे तळपाय सर्पाकार म्हणजेच खोलवट असतात अशा प्रकारची स्त्री आपल्या सोबत नेहमी चांगल्या गोष्टी घेऊन येते. ज्या स्त्रीचे डोळे हरणी सारखे असते ती स्त्री अत्यंत भाग्यशाली समजते आणि या स्त्री मुळे त्या कुटुंबाचा सुद्धा उद्धार होत असतो. ज्या स्त्रीच्या बेंबीजवळ तीळ असते अशा प्रकारची स्त्री आपल्या पतीला खूपच ऐश्वर्या धन प्राप्त करून देत असते तर हे होते काही अशी लक्षणे जे आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.