मिठाच्या डब्यात ठेवा फक्त हि 1 वस्तू; गरिबी कायमची निघून जाईल आणि पैसे येण्याचा मार्ग होईल मोकळा.!

अध्यात्म

मीठ आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे.जर जेवणात मीठ जास्त झाले तरी अन्न चांगले लागत नाही व मीठ कमी असेल तरीही आपल्याला चव लागत नाही.मिठाचे असे अनेक उपाय आहे ज्यामुळे आपल्याला दीर्घायुष्य प्राप्त होते त्यामुळे तसेच अनेक काही गोष्टी आहेत ज्याने आपले आयुष्य कमी होते. मिठाचा उपयोग कशा पद्धतीने करावा याबद्दल अनेकांना फार कमी माहिती नसते म्हणूनच आज आम्ही तुम्हाला स्वयंपाकातील मिठाचा उपयोग कशा पद्धतीने करायचा आहे हे सांगणार आहोत.

आपल्या जीवनामध्ये अनेक संकटे, अडचणी येत असतात ,ते संकट मिठाच्या सहाय्याने दूर करण्यासाठी काही महत्त्वाचे उपाय सुद्धा आज आपण जाणून घेणार आहोत. मिठाचे अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. ते वेगवेगळे प्रकार म्हणजे काळे मीठ, सैंधव मीठ, समुद्री मीठ आणि सामान्य असे वेगवेगळे मिठाचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात आणि हे मीठ आपल्याला सहज वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्ध सुद्धा होऊन जाते.

ज्योतिष शास्त्रानुसार मिठाला चंद्र आणि शुक्र यांचा प्रतिनिधी मानले जाते. ज्योतिष शास्त्रानुसार स्टील किंवा लोखंडी भांड्यात मीठ ठेवले तर तिथे शनि व चंद्र यांची युती होते आणि हे आपल्यासाठी खूपच घातक सिद्ध होते. हे रोग व शोकाचे कारण बनते. मिठाला प्लास्टिकच्या भांड्यामध्ये सुद्धा ठेवू नये. मिठाला काचेच्या बरण्यांमध्ये ठेवले तर त्याचा वाईट प्रभाव आपल्या जीवनावर जाणवत नाही.

मीठ सांडले तर ते सुद्धा अपशकुन मानले जाते. मीठ पडल्यास शुक्रवारी चंद्र दोन्ही ग्रह कमजोर होतात. स्वयंपाक करताना मीठ कमी-जास्त झाले तर आपण ते नंतर टाकू शकतो परंतु स्वयंपाक करताना भाजी चाखून पाहू नये. यामुळे आपल्या जीवनामध्ये दरिद्रता येते. भगवंतांना नैवेद्य दाखविल्याशिवाय स्वयंपाक खाऊ नये. मीठ थेट कुणाच्या हातावर ठेवू नये.

मिठाची पुडी सुद्धा डायरेक्ट कोणाचा हातावर देऊ नये यामुळे चांगले संबंध खराब होतात. आजच्या लेखामध्ये आपण मिठाचे असे काही उपयुक्त गुणधर्म व लाभ जाणून घेणार आहोत. जर तुमच्या घरामध्ये सुद्धा अनेक अडचणी येत असतील, आर्थिक अडचणी निर्माण होत असतील तर या उपायांच्या साह्याने तुम्ही आवश्यक दूर करा. हे उपाय केल्याने तुमच्या जीवनातील सर्व समस्या नष्ट होणार आहे आणि त्याचबरोबर माता महालक्ष्मीची कृपा दृष्टी सुद्धा तुमच्या प्राप्त होणार आहे. चला तर मग जाणून घेऊया मिठाचे अनेक उपाय आहेत त्याबद्दल..

हे वाचा:   घरात याठिकाणी ठेवा झाडू..चारही बाजूने पैसा येईल..लक्ष्मी माता प्रसन्न होईल..जाणून घ्या वास्तुशास्त्र उपाय

सर्वात पहिला उपाय म्हणजे आपल्याला आधी काळे मीठ घ्यायचे आहे. ते मीठ लाल कपड्यांमध्ये ठेवून त्याची पुरचुंडी आपल्याला बनवायची आहे आणि ही पुरचुंडी आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराजवळ लावायची आहे यामुळे तुमच्या घरामध्ये नकारात्मक उर्जा प्रवेश करणार नाही. काळया मिठाची पुडी जर तुम्ही तुमच्या तिजोरीवर ठेवली तर यामुळे तुमच्या धनामध्ये पैशांमध्ये वाढ होणार आहे.

यामुळे तुमचे तिजोरी नेहमी भरलेली असेल व माता महालक्ष्मीची कृपा सुद्धा तुमच्यावर सदैव राहील. हा उपाय केल्याने तुमच्या घरा मध्ये नेहमी सुखशांती वास्तव्य करेल त्यानंतर दुसरा उपाय म्हणजे आपल्याला एक काचेची बाटली घ्यायची आहे आणि त्या काचेच्या बाटलीमध्ये आपल्याला मीठ भरायचे आहे आणि ही बाटली आपल्याला बाथरूम मध्ये ठेवायचे आहे. असे केल्याने आपल्या बाथरूम मधील नकारात्मक विचार निघून जाईल व बाथरूम मधील जे जीवजंतू कीटक असतात त्यांच्यापासून सुद्धा तुमचे संरक्षण होईल.

शास्त्रामध्ये सांगण्यात आलेले आहे की मीठ व काच हे दोन्ही राहूचे कारक आहेत. म्हणून जर आपण घराच्या एका कोपऱ्यामध्ये काचेच्या बाटलीमध्ये मीठ ठेवले तर घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. स्टील भांड्यात मीठ ठेवले तर अशावेळी चंद्र व शुक्र यांची युती होऊन त्याचे परिणाम तुम्हाला भयंकर होऊ शकतील यामुळे तुमच्या जीवनामध्ये दुःख अडचणी निर्माण होऊ शकतात म्हणून मीठ नेहमी काचेच्या बरणीत ठेवावे.

घरामध्ये नेहमी पैसा खेळायचा राहावा असे वाटत असेल तर एक काचेचा ग्लास घेऊन त्यामध्ये थोडेसे पाणी भरून त्यामध्ये मीठ ठेवायचे आहे आणि हे मीठाने भरलेले ग्लास आपल्याला घराच्या नैऋत्य दिशेला ठेवायचे आहे, असे केल्याने आपल्या घरामध्ये पैसा नेहमी खेळता राहतो आणि या ग्लास मागे एक लाल रंगाचा दिवा लावावा म्हणजेच बल्ब पेटवावा.

या ग्लास मधील पाणी पूर्णपणे सुकून गेल्यावर नंतर पुन्हा आपल्याला त्यामध्ये मीठ आणि पाणी भरायचे आहे त्याचबरोबर जर तुमच्या बाथरूम मध्ये कोणतीही नकारात्मक उर्जा असेल तर अशावेळी आपल्याला बाथरूम मध्ये समुद्री मीठ ठेवायचे आहे यामुळे तुमच्या बाथरूम मधील वास्तु दोष पूर्णपणे दूर होऊन जाणार आहे. जर तुमच्या घरातील बाथरूम चुकीच्या दिशेला असेल तर बाथरूमच्या उंबरठ्यावरील लाल रंगाने जाड रेषा काढावी यामुळे सुद्धा दोष दूर होतो.

हे वाचा:   मकर संक्रांति दिवशी या ४ वस्तू दान केल्याने तुम्ही धनवान बनू शकता...हे दान तुम्हाला श्रीमंत बनवते आजच जाणून घ्या

आपल्या शास्त्रांमध्ये नजर दोष दूर करण्यासाठी सुद्धा मिठाचा मोठ्या प्रमाणात उपाय केला जातो. जर तुमच्या बालकाला नजर लागली असेल तर अशा वेळी चिमूटभर मीठ घेऊन त्याच्या अंगावरून ओवाळावे आणि ते मीठे वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यावे. जर आपल्याला व्यक्तिगत नजर लागली असेल तर अशा वेळी मूठभर समुद्र मीठ घेऊन आपल्या अंगावरून तीन वेळा फिरवावे व असे आपल्याला तीन दिवस करायचे आहे आणि त्यानंतर हे मीठ शौचालयांमध्ये फेकून द्यायचे आहे असे केल्याने आपल्याला जर कोणाची नजर लागली असेल तर ती नजर निघून जाते.

अनेक वेळा वास्तुदोष दूर करण्यासाठी सुद्धा मिठाचा उपयोग केला जातो असे काही दोष असतात जी आपण दूर करू शकत नाही परंतु काही दोष आपल्या हातामध्ये असतात त्याच्या आधारे आपण आपल्या घरातील वास्तुदोष दूर करू शकतो. जर तुम्हाला तुमच्या वास्तूमध्ये नेहमी भय वाटत असेल ,बेचैनी वाटत असेल तर अशा वेळी आपल्या दोन्ही हातांमध्ये मीठ घेऊन थोडा वेळ उभे रहा आणि त्यानंतर हे मीठ बेसिन मध्ये टाकून द्या. पाणी चे नळ चालू करून ते मीठ पूर्णपणे वाहू द्या असे केल्याने आपल्या घरातील वास्तुदोष संपूर्णपणे नष्ट होऊन जातो.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.