फक्त १ चमचा आणि शरीरातील उष्णता लगेचच कमी; उन्हाळी लागणे, हातापायाला मुंग्या येणे होईल बंद.!

आरोग्य

उन्हाळ्यात जसा तीव्र होऊ लागतो त्याच बरोबर आपली पचनशक्ती सुद्धा मंद होऊ लागते. वाढलेल्या उष्णतेमुळे शरीरातील जलतत्त्व कमी होते त्यामुळे उष्णतेचे विकार वाढू लागतात. शरीरामध्ये उष्णता खूप मोठ्या प्रमाणावर वाढीस लागते त्यामुळे सातत्याने तहान लागते ,उन्हाळा लागू लागतो, हाता पायाला मुंग्या येऊ लागताच अंगाची लाही लाही होऊ लागते ,डोकेदुखी होते, थकवा जाणवू लागतो, चक्कर येऊ लागते, डोके अंग दुखी ला होऊ लागते यासारख्या समस्या खूप मोठ्या प्रमाणात त्रास देऊ लागतात.

या सर्व त्रासांवर हा आजचा उपाय रामबाण औषध ठरणार आहे. शरीरातील उष्णता कमी करणारा आणि आपले शरीर थंड व ताजेतवाने ठेवणारा हा आजचा उपाय खूपच महत्त्वाचा आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचा पदार्थ लागणार आहे त्या पदार्थाचे नाव आहे वाळा. वाळा हे आपल्याला आयुर्वेदिक स्टोअर मध्ये सहज उपलब्ध होत असते. वाळा हे पित्तनाशक शरीराला थंडावा देणारा असा महत्व पूर्ण पदार्थ आहे.

हे वाचा:   चंदनापेक्षाही मौल्यवान आहे हे कडुनिंब तेल; नीम तेल, केसांच्या सर्व समस्यांवर अत्यंत गुणकारी.!

हा उपाय करण्यासाठी आपल्याला मुठभर वाळाच्या मुळा घ्यायचे आहेत आणि त्यानंतर दुसरा पदार्थ आपल्याला जाड खडीसाखर घ्यायची आहे. ही खडीसाखर बलवर्धक तोंडाला गोड चव देणारी असते. अतिशय महत्त्वपूर्ण असणारे हि खडीसाखर उष्णतेच्या समस्येवर गुणकारी ठरते. हा उपाय करण्यासाठी आपल्याला वाळा आणि खडीसाखर यांची बारीक पावडर करून घ्यायची आहे.

एकदा हि पावडर बारिक केल्यानंतर एका ग्लासमध्ये पाणी घेऊन एक चमचा हे मिश्रण आपल्याला त्यात टाकायचे आहे त्यानंतर आपल्याला एक चमचा चंदन पावडर टाकायची आहे त्यानंतर हे मिश्रण आपल्याला चमच्याच्या साहाय्याने पूर्णपणे एकजीव करायचे आहे , असे केल्यानंतर दहा मिनिटं हे मिश्रण तसेच राहू द्या मग गाळणी च्या साह्याने हे मिश्रण गाळून आपल्याला रस प्यायचा आहे अशा पद्धतीने हा उपाय आपला तयार झालेला आहे.

हे वाचा:   जिभेवरील पांढरा थर फक्त १ मिनिटांतच जाईल; या पदार्थाने जीभ साफ करा, जीभ कायम स्वच्छ व निरोगी राहील.!

आपल्या शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी दिवसभरातून एकदा या रसाचे सेवन आपल्याला करायचे आहे. हा उपाय आपण आठवडाभर जरी केला तरी आपल्या उष्णतेच्या समस्येवर लवकर इलाज होईल आणि त्याचबरोबर तुमच्या शरीरामध्ये पित्ताची समस्या असेल ती सुद्धा लवकर नष्ट होऊन जाईल म्हणूनच हा अगदी घरगुती उपाय असल्याने त्याचा कोणताही दुष्परिणाम नाही त्यामुळे अवश्य हा उपाय करा.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.