फक्त पाच शनिवार इथे लावा तेलाचा दिवा; करोडो रुपयांचे कर्ज लगेचच फिटेल.!

अध्यात्म

नाथ संप्रदायातील कर्जमुक्तीचा अचूक तोटका आज आपण जाणून घेणार आहोत. कोणत्याही कारणास्तव जर तुम्ही मोठ्या प्रमाणात कर्ज काढले असेल आणि आता कर्जमुक्तीची तुमची इच्छा आहे. कर्जाचा डोंगर वाढत चाललेला आहे परंतु कर्ज काही केल्या चुकवता येत नाही. कर्जाचे हप्ते वेळेत जात नाहीत. अशावेळी कर्जातून मुक्ती मिळवण्यासाठी नाथ संप्रदायातील हा एक महत्त्वाचा उपाय जरूर करा. हा उपाय कसा करायचा.? हा उपाय करताना नेमकी कोणती काळजी घ्यायची आहे.? हे आज आपण आपल्या लेखात जाणून घेणार आहोत.

शनिवारच्या दिवशी आपण अशा एका मंदिरात जायचे आहे , ज्या मंदिरात तेल चढवले जाते. ज्या देवतेवर तेल चढवले जाते अशा मंदिरात आपल्याला जायचे आहे.आपल्या आसपास अशी अनेक मंदिर आहेत त्या मंदिरातील देवी देवतांवर तेल चढविले जाते व तेल अर्पण केले जाते. अशा मंदिरात शनिवारी जाऊन घरी परततांना आपण त्या मंदिरात चढविलेले तेल परत घेऊन घरी यायचे आहे आणि आपल्या घरामध्ये याच तेलाचा एक दिवा प्रज्वलित करायचा आहे.

हा दिवा आपल्या घरातील ईशान्य कोपऱ्यामध्ये ईशान्य कोपरा म्हणजे उत्तर आणि पूर्व या दिशांमधील मधली दिशा आहे त्यास ईशान्य असे म्हणतात. या दिशा ची साफसफाई करून त्या जागी एक मूठभर तांदूळ टाकायचे आहे किंवा त्या जागेवर तुम्ही झाडाचे पान सुद्धा ठेवू शकता. जर तुमच्याकडे काही नसेल तर तुम्ही फुल सुद्धा ठेवू शकता किंवा एखादी वाटी सुद्धा ठेवू शकता जेणेकरून या दिव्याला एक आसन प्राप्त होईल.

हे वाचा:   पिठाच्या डब्यात ठेवा या खास गोष्टी; घरातील आर्थिक संकट कायमचे होईल नाहीसे.!

महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे तेल घेऊन येताना आपण ज्या देवता समोर हे तेल घेऊन येणार आहोत त्या देवी-देवता समोर आपल्याला मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि म्हणायचे आहे की हे देवा, आम्ही तुम्हाला आमच्या घरामध्ये आमंत्रित करत आहोत. कृपया आमच्या वास्तूमध्ये तुम्ही यावे आणि हे सांगा की हे परमेश्वरा, आमच्या डोक्यावर मोठ्या प्रमाणात कर्जाच्या डोंगर झालेला आहे त्यामुळे तुम्ही आमच्या घरी चला आणि आम्हाला या कर्जातून मुक्त करा. कर्जमुक्ती प्रदान करा.

त्यानंतर पुढील शनिवारी पती-पत्नी दोघांनी जर तुमचे लग्न झाले असेल तर पती-पत्नी दोघांनी त्या ठिकाणी जा आणि जर तुम्ही अविवाहित असेल तर तुम्ही एकटेच सुद्धा जाऊ शकता आणि पुन्हा एकदा ते तेल घरी घेऊन या. ते घरी घेऊन येताना पुन्हा आपल्याला हीच प्रार्थना करायची आहे. दुसऱ्या शनिवारी तेल आल्यानंतर पुढील पाच शनिवार आपल्याला वरील प्रकार करायचा आहे आणि एकदा का तेल आणल्यानंतर घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे.

हे वाचा:   घरातील या कोपऱ्यात द्या हिरवा रंग; मनातील सर्व इच्छा होतील ताबडतोब पूर्ण.!

तसेच या मंदिरातून तुम्हीही तेल आणत आहात त्या मंदीरातील देवतेसमोर आपल्याला मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि त्या मंदिराला सातत्याने भेट द्यायची आहे अशाप्रकारे जर तुम्ही हा उपाय मनोभावे केल्यास तर तुमच्या सर्व इच्छा तर पूर्ण होतीलच पण त्याचबरोबर डोक्यावरील कर्जाचा डोंगर सुद्धा लवकरच कमी होईल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.