फक्त ३ वेळा करा याने हलका मसाज; गुडघेदुखी, टाचदुखी कायमची होईल बंद.!

आरोग्य

टाचेचे दुखणे व गुडघे दुखी थांबवण्यासाठी कराहा घरगुती उपाय. टाचेचे दुखणे व गुडघेदुखी हे वाढत्या वयासोबत अधिक दुखत असते परंतु सध्याच्या काळामध्ये सगळ्या वयोगटातील लोकांना हा त्रास झालेला आपल्याला पाहायला मिळत. हा त्रास दूर करण्यासाठी आपण अनेक उपचार सुद्धा करत असतो परंतु अनेक वेळा योग्य उपचार करून सुद्धा मनाला हवे तसे फरक पडत नाही म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी एक घरगुती असा सोपा आणि सरळ उपाय घेऊन आलेलो आहोत. चला तर मग जाणून घेऊया त्या बद्दल.

हा त्रास होण्याची वेगवेगळी कारणे सुद्धा असू शकतात त्यातील महत्त्वाचे कारण म्हणजे आपले वाढते वजन. अनेकदा वाढत्या वजनाचा ताण आपल्या गुडघ्यांवर होत असतो यामुळे हाडाचे घर्षण होऊन तसेच त्यांची झीज होऊन गुडघेदुखी होऊ लागते याशिवाय गुडघ्याला मार लागणे व कॅल्शियमची कमतरता तसेच एखाद्या आजारामुळे हाडे ठिसूळ होणे किंवा सांध्यांमध्ये यूरिक ॲसिड वाढल्यामुळे सुद्धा गुडघेदुखी होऊ लागते. अशा वेळी पेन किलर न घेता लेखामध्ये सांगितलेला उपाय अवश्य करा.

गुडघ्याच्या समस्या दूर करण्यासाठी आपल्याला तीन महत्त्वाचे पदार्थ लागणार आहेत, त्यातील महत्त्वाचा पदार्थ म्हणजे हळद. मार लागल्यावर तसेच शरीरावरील अन्य आजार दूर करण्यासाठी हळदीचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो तसेच आयुर्वेदिक शास्त्रामध्ये हळदीला महत्त्वाचे मानले गेले आहे.

हे वाचा:   तापाचे सर्वात प्रभावी औ'षध..सर्दी खोकला ताप एक तासात गायब..ऑक्सिजन १०० राहील..खात्रीशीर घरगुती उपाय

जर तुमच्याकडे आंबेहळद असेल तर उत्तमच जर नसेल तर तुम्ही घरातील साधारण हळद सुद्धा या उपायासाठी वापरू शकता. हळदीमध्ये इन्फलामेंटरी तसेच अँटी सेप्टिक गुणधर्म असल्यामुळे गुडघेदुखी च्या समस्या वर हळद उपयोगी ठरते. हळदीमुळे सांधेदुखी वरील सूज कमी करण्यासाठी मदत होते. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक चमचा हळद घ्यायची आहे यानंतर आपला दुसरा पदार्थ घ्यायचा आहे तो म्हणजे खाण्याचा चुना.

हा चुना आपल्याला किराण्याचे दुकानावर तसेच पानटपरीवर सहज उपलब्ध होतो. पूर्वीच्या काळी चुना डोकेदुखी व तसेच एखादा मार लागल्यानंतर त्यावर लावला जात असे. म्हणूनच चुना एक वेदनाशमक म्हणून ओळखले जाते. या उपाय साठी आपल्याला दोन ते तीन चिमटा चुना द्यायचा आहे. यानंतर आपल्या तिसरा घटक घ्यायचा आहे त्याचे नाव आहे तिळाचे तेल. तिळाचे तेल शरीरात खोलवर जाऊन वेदना दूर करत असते त्याचबरोबर त्यामुळे गुडघ्यांना अराम देईल देईल व गुडघ्यांमधील संपलेले वंगण भरून निघते.

हे वाचा:   शुगर 400 असो की 500; रस्त्याच्या कडेची ही वनस्पती करेल पूर्ण नॉर्मल..मधुमेहाच्या सर्व गो'ळ्या बंद होतील..एकदा जरूर पहा !

हा उपायासाठी आपल्याला एक ते दोन चमचा तिळाचे तेल घ्यायचे आहे त्यानंतर हे तिने घटक आपल्याला एकत्र करायचे आहेत. गुडघ्यांच्या आरोग्यासाठी शेक घेणे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे ठरते त्याचबरोबर तुमचे टाच नेहमी दुखत असेल तर पायाला सोसेल तेवढे गरम पाणी घेऊन त्यामध्ये कापुराची पावडर मिक्स करून हलकासा शेक घ्या त्यानंतर आपल्याला हे मिश्रण प्रभावित जागेवर लावायचे आहे. हलक्या हाताने मसाज करायचा आहे. हे मिश्रण लावल्यानंतर तीन ते चार तास आपल्याला राहू द्यायचे आहे ,अशा पद्धतीने दिवसभरातून दोन तीन वेळा हा लेप लावल्यामुळे तुमचे गुडघेदुखी लवकरच बरी होईल. अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय सात दिवस करायचा आहे.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.