या ३ स्त्रियांनी चुकूनही करू नका तुळशीची पूजा; परिणाम जाणून पायाखालची जमीनच सरकेल.!

अध्यात्म

तुळशीची पूजा या महिलांनी चुकूनही करू नये अन्यथा लागते महापाप. हिंदू धर्मामध्ये तुळस पूजनीय मानले जाते त्याचबरोबर सर्वश्रेष्ठ सुद्धा समजले जाते. हिंदू धर्म शास्त्रामध्ये अशी मान्यता आहे की, ज्या घरामध्ये तुळशी मातेची मनापासून पूजा केली जाते. अशा ठिकाणी सुख, शांती,वैभव, समृद्धी खूप मोठ्या प्रमाणावर स्थिर राहते याउलट ज्या घरामध्ये तुळशी मातेची पूजा केली जात नाही तसेच ज्या घरासमोर तुळशी नसते अशा ठिकाणी मात्र खूप मोठ्या प्रमाणावर नकारात्मक ऊर्जा जाणवत असते.

तुळशीचे फक्त धार्मिक महत्त्व आहे असे नाही तर वैज्ञानिक दृष्ट्या तुळशीची खूप सारी असे महत्त्व आहे. जे आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे. तुळशीचे अनेक प्रकार आहेत. राम तुळस, कृष्ण तुळस ,भवानी तुळस, तुळस असे अनेक तुळस आपल्याला सगळे पाहायला मिळते. परंतु आपल्या घरासमोर पूजेसाठी प्रामुख्याने राम तुळस व कृष्ण तुळस पूजेसाठी सर्वोत्कृष्ट मानले जातात.

ईतर तुळशीची पूजा केल्यास आपल्याला पाहिजे तेवढे फळ मिळत नाही म्हणूनच आज आपण आपल्या लेखाच्या माध्यमातून अशा कोणत्या तीन महिला आहेत ज्यानी चुकूनही माता तुळशीची पूजा करू नये अन्यथा खूप मोठे अनर्थ घडते किंवा चुकूनही माता तुळशी कडे जाऊ नये. कारण या चुका केल्याने त्या पापाच्या भागीदारी होऊ शकतील.देव उठणीच्या एकादशीला ज्या घरात माता तुळशीचा विवाह संपन्न केला जातो त्या लोकांना अनेक शुभ फळांची प्राप्ती होत राहते आणि कन्या दाना इतके पुण्य त्यांना त्यांना लागते.

अनेक महिला असे प्रश्न विचारतात की मासिक धर्म वेळी त्या विशिष्ट ५ दिवशी माता तुळशीची पूजा करावी का? हिंदू धर्म शास्त्र असे मानते की त्याचबरोबर महाभारतातील एक दाखला आपण येथे जाणून घेणार आहोत. जेव्हा द्रौपदीचं वस्त्रहरण झाले होते. युधिष्टिर सर्वकाही हरला होता आणि त्यावेळी दुर्योधनाने द्रौपदीला केसाने खेचून राज दरबारात हजर करण्याचा आदेश दिला तेव्हा द्रौपदी रजस्वला होती.

हे वाचा:   खिशात ठेवा फक्त हि १ वस्तू; आयुष्यात पैसा, यश, कीर्ती एवढी मिळेल कि सांभाळताही येणार नाही.!

द्रोपदी ती स्वतः एका वेगळ्या कक्षात एका कपड्यात होती म्हणजेच आपल्याला लक्षात येईल की ही जी प्रथा आहे ती प्राचीन काळा पासून चालत आली आहे म्हणूनच या पाच दिवसात महिलांनी कोणत्याही धार्मिक पूजेमध्ये व कार्यामध्ये सहभागी होऊ नये तुळस अत्यंत पवित्र मानली जाते आणि जाते आणि म्हणूनच या पाच दिवसांमध्ये स्त्रियांनी तुळशीची कोणत्याही पद्धतीने पूजा करू नये किंवा तुळशीजवळ जाणारी कटाक्षाने टाळले पाहिजे.

तुळशीचे पाने तोडणे व तुळशीच्या व तुळशीच्या जवळ जाणे या सारख्या गोष्टी सुद्धा अत्यंत चुकीच्या व वर्ज मांनण्यात आलेले आहेत. ज्या विवाहित आहेत व ज्या सौभाग्यवती आहेत अशा महिलांनी विशेष करून माता तुळशीची पूजा करावी. तुळसी विवाह नक्की संपन्न करावा. असे केल्याने त्यांचे वैवाहिक जीवन तर सुखी होतेच त्याच बरोबर हाच जोडीदार सात जन्म सुद्धा लाभतो.

तसेच सर्वात मोठी अत्यंत महत्त्वाची अशी चूक येथे अशी होती की शारीरिक संबंध ठेवल्या नंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये महिलांनी माता तुळशीची पूजा करू नये किंवा माता तुळशीजवळ जाणे किंवा तुळशीला स्पर्श करणे यासारख्या गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात. संबंध ठेवल्या नंतर आंघोळ करावी कमीत कमी डोक्यावरून पाणी घ्यावे आणि त्यानंतरच तुम्ही माता तुळशीची पूजा करू शकता. तुळशीच्या रोपट्याची पाने तोडताना त्या पानांचा झाडाला काही त्रास होणार नाही ,अशा पद्धतीने या तुळशीची रोपांची पाने तोडावीत म्हणून आज आम्ही तुम्हाला एक मंत्र सांगणार आहोत. त्या मंत्राचा जप तुम्ही तुळशीचे पाने तोडताना अवश्य करावा. महाप्रसाद जननी सौभाग्य वर्धिनी आधी व्याधी हरा नित्यम तुळसी त्वम नमो नमः

हे वाचा:   स्वप्नामध्ये स्वतःला मरत असताना पाहणे याचा नेमका काय अर्थ असतो.? स्वप्नामध्ये स्त्री ला पाहणे म्हणजे….

माता तुळशीचे पाने तोडताना जर या मंत्राचा जप तुम्ही केल्यास तुमच्या जीवनातील जे काही दुःख संकट आले आहेत ते लवकरच नष्ट होतील. अनेकदा आपल्याला अनेक घरांमध्ये एक चुकीची गोष्ट नजरेस पडत असते की ती म्हणजे तुळशीच्या बाजूला झाडू ठेवला जातो किंवा चपला ठेवलेला असतात किंवा तुळशीची कुंडी आहेत या कुंडीमध्ये इतर झाडे लावली जातात.

खरं तर ज्या कुंडीमध्ये , वृंदावना मध्ये तुळशीची स्थापना केली जाते. अशा ठिकाणी कोणतीही दुसरी झाडे लावू नयेत.जर तुम्हाला असं जाणवत आहे की तुमच्या घरा मध्ये मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा आहे तर अशा वेळी एक मोठा पितळी लोटा घ्यावा आणि या पितळी तांब्या मध्ये जल भरावे आणि त्या पाण्यामध्ये तुळशीची काही पाने टाकावीत.

त्यानंतर २४ तास हे पाणी तसेच ठेवावे मग तुळशीचे पाणी टाकलेल्या तांब्यातील पाणी आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर व घरातील प्रत्येक खोलीमधील या तांब्यातील पाणी शिंपडावे आणि उर्वरित जल कोणत्याही झाडाच्या बुंध्याशी टाकावे. ज्या ठिकाणी तुम्ही कोणत्याही प्रकारच्या वस्तू तसेच अस्वच्छता ठेवू नये. असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा घराच्या बाहेर पडते तसेच आपले घर नेहमी आनंदी व प्रसन्न राहते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.