श्रीकृष्ण सांगतात या 11 झाडांची पूजा जीवनात एकदा तरी करावी; गरीबी कायमची होते दूर.!

अध्यात्म

आज आम्ही तुम्हाला घरासाठी शुभ असणारी कोणती अकरा झाडे आहेत याबद्दल ची माहिती सांगणार आहोत तसेच त्यांच्या आपल्या आयुष्यावर काय परिणाम होतो याबद्दल ही आपण जाणून घेणार आहोत. असे म्हटले जाते की ज्यांच्या घरापुढे झाडे असतील त्यांच्या घरी नेहमीच खूप व समृद्धी बहरते परंतु त्यातल्या त्यात वास्तुशास्त्रानुसार काही झाडे आपल्या घरासाठी शुभ असतात,

परंतु काही झाडे घराच्या बाहेर लावल्यास त्यांची अशुभ फळ सुद्धा आपल्याला प्राप्त होतात म्हणून आपल्या घराचे भाग्य उजळवणारे झाडे आपल्या घराच्या बाहेर लावायला पाहिजेत त्यामुळे घराची शोभा तर वाढतेच पण त्याचबरोबर घरांमध्ये फायदे सुद्धा जाणवू लागतात. चला तर मग जाणून घेऊया कोण कोणती आहेत ती झाडे.

डाळिंबाचे झाड:- डाळिंबाचे झाड जर घरात लावले तर आपल्यावर भविष्यात कर्ज होत नाही व आधीचे कर्ज असल्यास तेही लवकर फिटून जाते याशिवाय या झाडामुळे घरात समृद्धी येते.

हळदीचे झाड:- हळदीचे झाड लावल्यास घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकत नाही शिवाय हळदीचे झाड हे जंतुनाशक असते म्हणून हे झाड घरामध्ये लावले पाहिजे.

गोकर्ण किंवा कृष्ण कांताची वेल:- निळ्या रंगाची छोटी छोटी फुले येणारी वेल आपल्या घरासमोर जरूर लावावी यावेली ला माता महालक्ष्मीचे स्वरूप मानले गेले आहे. यामुळे आपल्या आर्थिक समस्या व पैशाविषयी अडचणी लवकर दूर होतात. हे झाड घरासाठी खूपच शुभ मानले जाते.

नारळाचे झाड:- ज्याच्या घराचा समोर नारळाचे झाड असते अशा व्यक्तींना समाजामध्ये खूप आदर व सन्मान मिळतो कारण नारळे सन्मानाचे प्रतीक आहे म्हणून आपल्या दारासमोर नारळाचे झाड जरूर लावावे.

हे वाचा:   स्त्रिया आपल्या पार्टनरला हि गोष्ट विचारण्यास खूप लाजतात.. पण त्यांना याची खूप गरज असते म्हणून स्त्रिया अशाप्रकारे.. पुरुषांनी नक्की पहा

हिंदुधर्मात प्रत्येकाच्या दारासमोर तुळस ही असतेच तुळशीला हिंदू धर्मशास्त्रामध्ये खुपच पवित्र असे वृक्ष मानले पवित्र असे वृक्ष खुपच पवित्र असे वृक्ष मानले जाते त्याशिवाय तुळशीला माता महालक्ष्मी चे स्वरूप सुद्धा मानतात. तुळशी वातावरणातील नकारात्मक ऊर्जा स्वतःमध्ये शोषून घेते आणि सकारात्मक ऊर्जा उत्सर्जित करत असते परंतु तुळस घराच्या दक्षिण दिशेला असू नये अन्यथा शुभ फळ मिळणार नाही. आपल्याला अशुभ फळ प्राप्त होतील.

तुळशी घरांमध्ये उत्तरेला ईशान्येला उत्तरेला आणि पूर्वेला लावणे शुभ असते. या दिशेला लावलेली तुळस घरामध्ये खूपच सकारात्मक परिणाम देत असते. कितीतरी घरांच्या आसपास आपल्याला आंब्याची झाडे पाहायला मिळतात परंतु जर आंब्याचे झाड आसपास असेल तर त्याचा विपरीत परिणाम घरातील लहान मुलांवर पाहायला मिळतो व त्याची अशुभ फळे मुलांना भोगायला लागतात म्हणून आंब्याचे झाड कधीही लावू नये जर आंब्याचे झाड आधीपासूनच असेल तर त्या झाडाच्या आजूबाजूला कडुलिंब ,अशोक यांची झाडे लावून नकारात्मक परिणाम कमी करण्यासाठी सकारात्मक ऊर्जा देणारी झाडे लावावीत.

छोटी छोटी रोपे व वेल आपण आपल्या घराच्या बाल्कनीमध्ये व ओपन स्पेस मध्ये लावू शकतो परंतु घराच्या कंपाऊंड पेक्षा उंच वेल असू नये. वडाचे झाड व पिंपळाचे झाड यांना आपल्या हिंदू धर्मामध्ये खुपच पवित्र मान्य गेलेले आहे परंतु घरी नाही तर मंदिरात लावावीत. वडाचे झाड आपल्या आजूबाजूचे वातावरण सुद्धा शुद्ध ठेवते. आपल्या मुलांचे अभ्यासामध्ये मन लागत नसेल त्यांची बुद्धी कमजोर असेल घरामध्ये पैशाची समस्या असेल तर पैसा येतो पण तो टिकत नाही तर दारासमोर अशोकाचे झाड जरूर लावावे.

हे वाचा:   सकाळी उठताच बोला हे दोन शब्द; मनातील सर्व इच्छा होतील पूर्ण.!

आवळ्याचे घर झाड दारात लावल्यास आजार पण येत नाही व आपल्या कुटुंबाचे स्वास्थ्य चांगले राहते. झेंडू चे रोप आपल्या दारासमोर लावण्यात आपला बृहस्पती मजबूत होतो व आपले वैवाहिक जीवन सुखी व आनंदी राहते. घराच्या उद्देश समोर कोणतेही झाड असू नये. बोन्साय केलेली चिनी झाडे घरात लावू नये यामुळे मुलांवर तसेच घरातील मुख्य सदस्यावर विपरीत परिणाम होतो व त्यांना नुकसान सहन करावे लागते. ज्या झाडांमधून फांदी पानं-फुलं तोडल्यानंतर दूध निघते अशी झाडे सुद्धा घरी लावू नयेत. काटेरी झाडे सुद्धा घरी कधीच लावू नयेत यामुळे घरांमध्ये भांडण होतात.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.