जेवताना जास्त प्रमाणात पाणी पीत असाल तर सावधान; तुम्हाला होऊ शकतात हे ४८ रोग.!

आरोग्य

आपल्या जीवनात पाण्याचे खूप महत्त्व आहे. एखादी व्यक्ती अन्नाशिवाय एकवीस दिवस राहू शकतो पण पाण्याशिवाय तो सात दिवसात मरण पावतो इतके हे पाणी महत्त्वाचे आहे आणि तसेच आपल्या शरीरातला ७० ते ८० टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे. त्यातही आपण जेवण करत असताना पाणी पितो त्याचे सुद्धा काही नियम आहेत.

आणि जर हे नियम तुम्ही पाळत असाल तर नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा होतो आणि जर तुम्ही नियम पाळत नसाल तर तुम्ही सांधेदुखी, पाठदुखी डोकेदुखी यांचे शिकार होतात त्याचप्रमाणे चेहऱ्यावर काळे डाग, पिंपल्स, मुरूम, केस गळणे, नेहमी पोटाचे आजार होणे ,खाल्लेले अन्न न पचणे, शरीरात कमजोरी येणे तसेच किडनी संबंधित आजार अशा विविध रोगांना बळी पडतात.

तसेच जेवताना पाणी पिण्याची योग्य पद्धत आहे, ती जर तुम्ही वापरली तर तुमचे हाड ,केस ,त्वचा चांगल्या राहतील. तुम्हाला कुठल्याही प्रकारचा रोग होणार नाही. आता ते नियम कोणते आहेत ते थोडक्यात पाहू या. पाणी कधीही घाई घाईत पिऊ नये.हळू हळू एक घोट घोट घ्यावे. एक घोट पाणी पिल्यानंतर ३० सेकंद किंवा एक मिनिट एवढा वेळ द्यावा.

हे वाचा:   आयुर्वेदानुसार दुधासोबत चुकूनही खाल्ले नाही पाहिजेत हे ३ पदार्थ; अन्यथा शरीर बानू शकते रोगांचे घर.!

हा नियम जर तुम्ही पाळत असाल तर तुमची ऍसिडिटी आणि पित्त जळजळ मळमळ हे मुळापासून संपून जाणार आहेव जेवताना पाणी पिऊ नये किंवा जेवणानंतर पाणी प्यावे. जर आपण जेवणाआधी पाणी प्यायले तर आपल्या शरीरातील आतड्या मंद होतात आणि अन्न नीट पचत नाही.

अन्नमध्ये एक घोट घोट पाणी प्या. अन्न कोरड असेल तर पाणी प्यावे अन्यथा पाणी पिऊ नये. आगीत पाणी उठल्या सारखं होतं आणि आग विझून जाते म्हणजे अन्न पचवण्यासाठी जे पित्ररस तयार झालेले असतात ते शमतात तसेच अन्न पचन न होण्याने अन्न सडते व गॅसचा परिणाम होतो आणि पोट दुखी, सांधेदुखी ,डोकेदुखी या गोष्टी सुरु होतात.

सर्वात प्रथम म्हणजे पोटातले अन्नपचन न झाल्यास होणारा परिणाम म्हणजे ऍसिडिटी किंवा पित्त जेवणाच्या आधी किंवा जेवणानंतर पाणी पीत असाल तर असे परिणाम होतात. साधारणपणे जेवणाच्या अर्धा तास अगोदर पाणी प्यावे तसेच जेवताना थोडं थोडं पाणी प्यावे. गरज नसेल तर पीऊ नये आणि जेवल्यानंतर अर्ध्या तासाने पाणी प्यावे त्यामुळे आपल्या तोंडातली लाळ त्या पाण्यामध्ये जाते आणि पचनासाठी मदत होते आणि वजन वाढण्याचे कारण देखील हेच आहे की आपण जेवल्यानंतर लगेच पाणी पितो.

हे वाचा:   याच्या फक्त ५ काड्या वापरा; आयुष्यात उष्णता पुन्हा कधीच होणार नाही.!

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.