या दिशेला लावलेली तुळस फा’यदा नाही तर उलट मोठे नुकसान करते..एकदा नक्की बघा कसा परिणाम पडतो..

अध्यात्म

नमस्कार वाचक मित्रानो, आपल्या देशामध्ये जर आपल्याला घर बांधायचे असेल तर किंवा घरामध्ये काही गोष्टी ,दिशा स्थापित करायचे असेल तर आपण नेहमी वास्तुशास्त्र जाणून घेवून त्या प्रमाणे विशेष काळजी घेतो. या लेखा मधून वास्तुशास्त्राशी निगडीत काही गोष्टी सांगणार आहोत. आपल्या देशात फार पूर्वी पासून तुळशी खूप महत्व आहे. आयुर्वेदात देखील तुळशी खूप गुणकारी आणि औषधी वनस्पती मानली जाते.

प्रत्येक व्यक्तीच्या घरासमोर तुळशी वृदांवन असते. दररोज सकाळी देवपूजा केल्यानंतर आपण तुळशीची देखील मनोभावे पूजा करतो. संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावून मनपूर्वक प्रार्थना करतो. तुळस ही एक आयुर्वेदिक वनस्पती असून, ती वनस्पती काही लोकांच्या श श्रद्धेचे प्रतिक आहे. तुळशी बद्दल अश्या काही गोष्टी आहेत, त्याचे पालन केल्यामुळे घरामध्ये , तुमच्या वास्तूमध्ये सुखशांती, सकारात्मक उर्जा , समृद्धी हमखास नांदते.

हिंदू ध-र्मामध्ये तुळशीला खूप महत्व आहे. वारकरी संप्रदायानुसार पंढरीच्या वारीत देखील तुळशीला खूप महत्व दिले आहे. तुळशी बुधाचे प्रतिनिधित्व करते, जे साक्षात श्री कृष्णाचे एक पवित्र रूप आहे. त्यामुळे अनेक लोक तुळशीची पूजा करतात. प्रत्येक व्यक्तीच्या घरी तुळशीचे रोप आढळते. आपल्या उत्तम आ’रोग्य लाभण्यासाठी देखील तुळशी खूप प्रमुख भूमिका बजावते.

हे वाचा:   घरात हे फोटो लावल्याने तुमचे भाग्य बदलेल; घरात पैशाची कधीच गरज भासणार नाही.!

तुळशी उच्च रक्तदाबासाठी फा’यदेशीर मानली जाते. तुळशीच्या पानांमध्ये रोग प्रतिकार शक्तीचे अनेक गुणधर्म आढळता. तुळशीचे पान सेवन केल्यामुळे आपल्या शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे आपल्या शरीरातील अनेक रोग बरे होतात. जीवाणू आणि विषाणुजन्य संक्रमणाशी लढा देण्यासाठी मदत होते.

काही लोक आयुर्वेदिक औ’षधी म्हणून तुळशीचे रोप आपल्या घरामध्ये लावतात. हिंदुधार्मानुसार आणि वास्तुशात्रानुसार आपल्या वास्तूमध्ये ,घरामध्ये तुळशीला योग्य ठिकाणी ठेवावे लागते. अयोग्य ठिकाणी ,चुकीच्या ठिकाणी ठेवल्यास त्याचे परिणाम अशुभ मिळतात. आपल्या घराच्या बाल्कनीत उत्तर आणि ईशान्य दिशेला तुळशीची पाच रोपे लावावीत.

यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती खूप चांगली आणि मजबूत होते. आजच्या काळात घरामध्ये किंवा घरांसमोर समोर जागा कमी असल्यामुळे लोक तुळशीचे रोप छतावर ठेवतात. वास्तुशास्त्रानुसार ते अयोग्य आणि अशुभ मानले जाते. त्यामुळे तुम्हाला धनहानी सहन करावी लागू शकते. तुळशीचे रोप आपल्या घरामध्ये वास्तुशास्त्रानुसार घराच्या बाल्कनीत किंवा खिडकीत उत्तर आणि पूर्व दिशेला लावावे.

हे वाचा:   प्रत्येक कामात अडथळे येतात.? साडेसातीमागे लागलीये.? घरात पैसा टिकत नाही.? एकदा हे अवश्य करा.!

या दिशांना देवीदेवतांचे वास असून ती जागा पवित्र असते. या जागी तुळशीचे रोप लावल्याने वास्तूमध्ये सकारात्मक गोष्टी घडतात. पूजेच्या वेळी देवी देवतांना तुळशीची पाने अर्पण केल्यास त्याची फळे शुभ आणि उत्तम मिळतात.  तुळशी सोबत निवडुंग आणि अन्य काटेरी झाडे लावू नयेत. अमावास्या,चतुर्दशीला , द्वादशीला तुळशीची पाने तोडू नये. रविवारी तुळशीची पूजा केली जात नाही.

रविवारी देखील तुळशीची पाने तोडू नये, ते देखील अशुभ मानले जाते. तुळशीचे रोप कधीही नखाने तोडू नये ते खूप मोठ्याप्रमाणात अशुभ मानले जाते. तुळशीचे रोप सुकले असेल तर फार काळ घरी ठेवू नये. यामुळे घरामध्ये नकारात्मकता निर्माण होते. सुकलेले तुळशीचे रोप वाहत्या प्रवाहात विसर्जन करावे . गणपतीच्या पूजेमध्ये कधीही तुळशीचे पान अर्पण करू नये.

तुळशीचे रोप स्वयपांक घरात लावल्यास पारिवारिक कलह निर्माण होतात. वास्तुनुसार तुळशीचे रोप दक्षिण दिशेला लावू नये. त्यामुळे व्यवसायामध्ये नुकसान होते. घरामध्ये तुळशीचे रोप लावताना विशेष काळजी घेतली पाहिजे. वरील माहिती आवडल्यास लाईक करून तुमच्या प्रतिक्रिया कळवा. तुमचे मनपूर्वक आभार.