सतत हाता-पायाला मुंग्या येतात का.? करा हा चमत्कारिक घरगुती उपाय; ५ मिनिटांत मिळेल आराम.!

आरोग्य

अनेकदा आपण बैठी काम करत असल्याने एकाजागेवर खूप वेळ बसून राहतो त्यामुळे आपल्या हाताला आणि पायांना मुंग्या येऊ लागतात.अनेकदा हा त्रास कायम स्वरुपी समस्या बनून जाते म्हणूनच हातावर आणि पायावर मुंग्या येणे यावर आज आपण घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.

त्यासाठी आपल्याला काहि साहित्य लागणार आहेत ते आपण माहिती करून घेऊया.आपप्याला एका लसणाच्या पाच ते सहा पाकळ्या लागणार आहेत, त्या पाकळ्या सोलून घ्यायच्या आहेत. दुसरी सामग्री आपल्याला लागणार आहे तिळाचे तेल. या तेलाशिवाय दुसरे कोणतेही तेल घेऊ नका , फक्त तिळाचं तेल घ्या. हे तेल आपल्या घरात किंवा मेडिकलमध्ये सहज उपलब्ध असते. तिसरे साहित्य लागणार आहे आपल्याला चिमूटभर जीरे. हे जिरे प्रत्येक किचनमध्ये उपलब्ध असते.

हे वाचा:   कच्चा लसूण उपाशीपोटी खात असाल तर हि माहिती एकदा नक्की वाचा; मिळतील असे फायदे जे तुम्ही कधी ऐकलेही नसतील.!

या सामग्री मध्ये उपलब्ध असणारे घटक यांना आयुर्वेदात खूप महत्व आहे.लसूण हा उष्ण पदार्थ आहे तसेच जिरे खाल्ल्याने अपचन सारख्या समस्या नष्ट होतात. आता आपल्याला पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या फ्रायपॅनमध्ये घ्यायच्या आहेत आणि त्यामध्ये थोडसं तिळाचं तेल टाकायचे आहे व चिमुटभर जिरे त्या फ्राय पॅन मध्ये टाकायचे आहे आणि ही सामग्री गॅसच्या हलक्या आचेवर फ्राय करून घ्यायची आहे.

लसणाच्या पाकळ्या जोपर्यंत हलक्या चॉकलेटी रंगाच्या होत नाही तोपर्यंत हलके आचेवर ही सामग्री फ्राय करायची आहे. लसणाच्या पाकळ्या खूप जास्त चॉकलेटी रंगाचा होऊ द्यायचा नाही आहेत. हलकासा चॉकलेटी रंग येऊ द्यायचा आहे आणि नंतर याचे सेवन कसे करायचे ते जाणून घेऊया थंड झालेल्या लसणाच्या पाकळ्या याचे सेवन आपल्याला रोज करायचे आहे.

हे वाचा:   झोप येत नसेल तर करा हा चत्मकारी उपाय; झोपेच्या गोळ्या घ्यायची गरजच पडणार नाही.!

रोज सकाळी रिकाम्या पोटी तीन ते चार पाकळ्या खायचे आहेत,असे सेवन आपल्याला पुढील नऊ दिवस करायचे आहे. असे केल्याने हाता पायाला मुंग्या येणे हळूहळू बंद होईल आणि नऊ दिवसानंतर पूर्णपणे आराम मिळेल.

तर मित्रांनो आम्हाला आशा आहे कि तुम्हाला हि माहिती नक्कीच आवडली असेल. आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना हि माहिती शेअर करायला जरूर विसरू नका. या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.