मित्रांनो, मा’तृत्व हा स्त्रीच्या जी’वनातील अत्यंत महत्त्वाचा प्रसंग असतो. मुलाच्या ज’न्मानंतर हिंदू ध’र्मातील री’तिरि’वाजाप्रमाणे अनेक संस्कार व धा’र्मिक विधी केले जातात. मूल ज’न्माला आले, की ‘सटुआई’ त्याच्या कपाळी प्रारब्ध (भाग्यरेषा) लिहिते, असा समज हिंदू ध’र्मामध्ये रू’ढ आहे. त्यामुळे ‘सटुआई’ ऊर्फ ‘सटी’ या देवतेचे बाळ व बा’ळंतीण यांच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व आहे.
सटवाई ही बालकांचे भविष्यलेखन करणारी देवता आहे असा हिंदू लोकांत समज आहे. या देवीस सटवी, सटुआई, सटी, षष्टी देवता, रानसटवाई, छटी, घोडा सटवाई असेही म्हणतात. सर्वसाधारण पणे बाळ अथवा बालिकेचे ज’न्माचे सहावे दिवशी या देवीची पूजा करण्यात येते. असा एक समज आहे कि सटवाई देवी ही कोणत्याही रूपाने येऊन त्या बालकाचे वि’धीलिखित लिहिते.
एक कोरा पांढरा कागद व टाक/पेन पूजेच्या ठिकाणी ठेवले जाते. झोपेत हसणाऱ्या बाळास ‘सटवाई हसविते’ असाही एक समज आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात या देवीची पूजा जास्त प्रच’लित आहे. सटवाई देवी अनेक गावांची ग्रामदे’वता आहे. हिच्या देवळाचे सहसा बांधकाम करीत नाहीत. फक्त आडोसा असतो.
“सटीचा लेखाजोखा, न चुके ब्र’म्हादिका” अशी एक म्हण या देवीबाबत प्रचलित आहे. हिने लिहीलेलं भविष्य कधी खोटं ठरत नाही. आजही आपले आजीआजोबा म्हणतात, सटवीने काय काय लिहीलंय काय माहीत नशीबात. यामागे एक पौराणिक कथा आहे, ती अशी की रोज रात्री आपली आई कुठे जाते असा प्र’श्न सटवाईच्या मुलीला पडला. तिने आईला विचारले तेव्हा तिने तो विषय टाळला. परंतु मुलीने खूप हट्ट धरला.
शेवटी तिला सांगणं भाग पडलं. ती सांगू लागली, मी ज’न्मलेल्या मुलांचे भविष्य लिहिण्यासाठी जाते. हे ऐकल्यावर ती मुलगी सटवाईला म्हणते, तू दुसऱ्यांचे भविष्य लिहितेस मग माझे भविष्य काय सांग. सटवाईचा आता नाईलाज होतो, ती म्हणते तुझे लग्न तुझ्या पोटी ज’न्मलेल्या मुलाशीच होईल. हे ऐकल्यानंतर त्या मुलीला ध-क्का बसतो. लग्नच न करण्याचा निर्णय ती मुलगी घेते.
थोड्या दिवसांनी एक राजपुत्र तिच्या झोपडीजवळ असलेल्या नदीकिनारी पाणी पिण्यासाठी येतो. नेमकं यो’गायो’गाने राजपुत्राने चूळ भरून थुंकलेले पाणी ती मुलगी पिते. त्यामुळे तिला दिवस जातात. हे सगळं तिच्यासाठी आ’श्चर्यकारक असतं. पण तिला वाटत नाही की आईने सांगितलेलं भविष्य खरं ठरेल. कालांतराने तिला मूल झाल्यानंतर भीतीने ती त्याला जंगलात टाकून देते.
यो’गायो’गाने ते मूल एका राजाच्या हाती लागते. तो त्या मुलाचे सं’गोपन व पालन पोषण करतो. तो मुलगा मोठा झाल्यानंतर शि’कारीसाठी एके दिवशी त्या जंगलात जातो. तिथे त्याला ही मुलगी भेटते. पण त्याला माहीत नसत की ती त्याची आई आहे व तिलाही माहित नसतं की हा मुलगा आपल्याच पोटी ज’न्मला आहे. या अनाव’धानामुळे तो तिच्या प्रेमात पडतो.
आपणास झालेला मुलगा आपण टाकून दिल्यामुळे आपल्या आईचे म्हणजेच सटवाईचे भविष्य खोटे ठरेल असे समजून तीही त्या युवकाच्या प्रेमात पडते. पुढे या दोघांचे लग्न ठरते. परंतु मूल टाकताना त्याच्याभोवती गुंडाळलेले कपडे त्याने जपून ठेवलेले असते. तो तिला ते कापड दाखवतो व आपला भूतकाळ सांगतो. आपले आपल्याच मुलाशी लग्न ठरल्याचे तिच्या लक्षात येते.
म्हणजेच सटवाईने सांगितलेलं भविष्य खरं ठरलेलं असतं. अशी कथा यामागे आहे. त्यामुळे सटवाईने लिहिलेलं भविष्य कधीही खोटे ठरत नाही असं या कथेचं ता’त्पर्य आहे.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी धार्मिक माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.