संपूर्ण श्रावण महिन्यात कोणत्याही सोमवारी देवघरात ठेवा हि वस्तू..घरात पैशांचा पाऊस पडेल..धन आकर्षित करण्याचा उपाय..

अध्यात्म

श्रावण महिना म्हणजे अत्यंत पवित्र असा महिना या महिन्यात भोलेनाथांची मनोभावे उपासना केली जाते व व्रत केले जातात. भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची मनोभावे पूजा केली जाते यामुळे भगवान भोलानाथ आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात.

अश्या पवित्र महिन्यात आपण जे काही उपाय करतो जे काही प्रयोग करतोत त्याचे अनंत पटीने फळ आपल्याला मिळते. त्यामुळेच अश्या श्रावण महिन्यात व्रत उपवास व अनेक ग्रंथाची पारायण केली जातात. अश्या पवित्र श्रावण महिन्यात आपल्याला आपल्या घरातील जे देवघर आहे त्या देवऱ्यात महिनाभर एक वस्तू ठेवायची आहे. ज्यामुळे तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील.

ही वस्तू देवाऱ्यात ठेवल्यानंतर या वस्तूची संपूर्ण श्रावण महिना तुम्हाला पूजा करायची आहे ज्याप्रमाणे आपण देवी देवतांची पूजा करतो त्याच प्रमाणे या वस्तूची ही आपल्याला मनोभावे पूजा करायची आहे. अगदी श्रावण महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत तुम्हाला या वस्तूची देवऱ्यात ठेऊन पूजा करायची आहे ही वस्तू नेमकी कोणती आहे ते आपण पाहूया.

हे वाचा:   घराच्या मुख्य दरवाजा जवळ लटकवा की १ वस्तू; कुलदैवत धावून येईल, पैसा आयुष्यभर कमी पडणार नाही.!

ही वस्तू आहे सुपारी कोणत्याही पूजा साहित्याच्या दुकानात जी पूजेची सुपारी मिळते. हे सुपारी आपल्याला श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी पासून आपल्या घरातील देवाऱ्यात पूजेसाठी ठेवायची आहे. लक्षात ठेवा आपल्या घरातील एखादी जुनी सुपारी असेल जे आपण आधी पूजेसाठी वापरली असेल तर अशी सुपारी आपल्याला घ्यायची नाही तर नवीन सुपारी आपल्याला या उपायात घ्यायची आहे.

आणि ती सुपारी संपूर्ण महिनाभर आपल्या देवाऱ्यात ठेऊन सुपारीची पूजा करायची आहे. दररोज अंघोळ झाल्यानंतर जेव्हा आपण आपल्या मंदिरातील आपल्या देवाऱ्यात देवांची पूजा करतो तेव्हा या सुपारीला ही स्नान घालून हळद कुंकू लावून सुपारीची पूजा करायची आहे. आणि पूजा झाल्यानंतर आपल्या मनात जे काही इच्छा आहे कोणतीही मनोकामना आहे ती पूर्ण होण्यासाठी आपण या सुपारीची स्थापना केली आहे.

हे वाचा:   वर्षातून केवळ एकदाच उघडतो या मंदिराचा रहस्यमय दरवाजा; जाणून घ्या या रहस्यमयी मंदिराविषयी.!

ती मनोकामना आपल्याला मनातल्या मनात बोलायची आहे आणि ती इच्छा पूर्ण होण्यासाठी देवाजवळ प्रार्थना करायची आहे. संपूर्ण महिनाभर असे केल्यानंतर जेव्हा श्रावण महिना संपेल त्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला या सुपारीचे वाहत्या पाण्यात विसर्जन करायचं आहे. या सुपारीचे विसर्जन केल्यानंतर तुमच्या घरातील सर्व दुःख, पिडा नाहीश्या होतील, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील, तुमच्या घरात धन-धान्याची भरभराट होईल, तुमच्या जीवनातील संकटे निघून जातील.

तर तुम्ही सुद्धा तुमच्या घरात सुख,संपत्ती येण्यासाठी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी घरात समाधान येण्यासाठी अशी एक सुपारी संपूर्ण श्रावण महिना तुमच्या देवघरात नक्की ठेवा. तुम्ही ही सुपारी दुसऱ्या किंवा तिसऱ्या श्रावण सोमवारी देखील ठेवू शकता.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.